आयपीएलचा १०००वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. मुंबईने राजस्थानकडून दिलेले २१३ धावांचे लक्ष्य ३ चेंडू राखून पूर्ण केले होते. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर या सामन्यात चांगलाच गदारोळ झाला होता. रोहित शर्मा अशाप्रकारे बाद झाल्याने चाहते नाखूश झाले आणि सोशल मीडियावर अंपायरच्या निर्णयाविरोधात टीका करत होते. त्याचवेळी, आयपीएलच्या ट्विटर हँडलवरून या घटनेचा एक नवीन व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे, ज्यामुळे या वादग्रस्त विकेटचे चित्र पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, राजस्थान रॉयल्सच्या २१३ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, रोहित शर्मा आणि इशान किशन मुंबईच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले. मुंबईच्या डावातील दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहित संदीप शर्माचा बळी ठरला. पण त्याच्या विकेटबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर गोंधळ घातला. वास्तविक, टीव्ही रिप्लेमध्ये असे दिसून येत होते की चेंडू स्टंपला आदळल्याने बेल्स पडले नाहीत, तर संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमुळे पडले. सोशल मीडियावर चाहत्यांनी स्लो मोशनमध्ये पोस्ट केलेले व्हिडीओ पाहूनही तसेच वाटत होते.

हिटमॅनच्या या वादग्रस्त विकेटच्या व्हिडीओचे सत्य स्वतः आयपीएलने ट्विटर हँडलवरून स्पष्ट केले आहे. संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमधून बेल्स पडले नसून बॉलमुळेच पडल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला बाद देण्याचा अंपायरचा निर्णय योग्य होता. चेंडू बेल्सवरच हलका आदळल्याचेही यातून स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा: LSG vs RCB Match: लखनऊच्या फिरकीसमोर बंगळुरुचे फलंदाज ढेपाळले, विजयासाठी अवघे १२७ धावांचे लक्ष्य

सामन्यात काय झाले?

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या गेममध्ये राजस्थान रॉयल्सने २१२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. २१ वर्षीय तरुण यशस्वी जैस्वालने ६२ चेंडूत १२४ धावा करत शानदार शतक झळकावले. प्रत्युत्तरात मुंबईची सुरुवात काही खास झाली नाही. यानंतर कॅमेरून ग्रीनने २६ चेंडूत ४४ आणि सूर्यकुमार यादवने २९ चेंडूत ५५ धावा करत आशा जिवंत ठेवल्या. अखेरीस, तिलक वर्मा २१ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. पण टीम डेव्हिड मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला, त्याने १४ चेंडूत ४५ धावा केल्या आणि संघाला ३ चेंडूत ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला. त्याने जेसन होल्डरच्या शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर बॅक टू बॅक सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईला शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video there was a ruckus on rohit sharmas wicket in the match against rajasthan now this truth came to the fore avw