India need 280 to win in WTC Final 2023: लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघांत डब्ल्यूटीसी फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या दोन्ही डावांच्या जोरावर भारताला ४४४ धावांचे लक्ष्य दिले. भारतासमोर ठेवलेले डोंगराएवढे लक्ष्य पार करु शकेल का? अशी चिंता भारतीय संघाच्या चाहत्यांना लागली आहे. त्यामुळे आज आपण भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वीपणे पाठलाग केलेले सर्वोच्च लक्ष्य कोणते आहे, ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताला विजयासाठी २८० धावांची गरज –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. ४४४ धावांच्या लक्ष्याचा प्रत्युत्तरात भारताने चौथ्या दिवसअखेर तीन गडी गमावून १६४ धावा केल्या. भारतीय संघाने ४० षटकांत ४.१च्या धावगतीने या धावा काढल्या. भारताला शेवटच्या दिवशी ९० षटकांत २८० धावा करायच्या आहेत आणि सात विकेट्स शिल्लक आहेत. विराट कोहली ४४ आणि अजिंक्य रहाणेने २० धावांवर नाबाद आहेत. आतापर्यंत या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ११८ चेंडूत ७१ धावांची भागीदारी झाली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताने पार केलेले सर्वोच्च लक्ष्य –

भारताविरुद्ध सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ४४४ धावांचे लक्ष्य दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने यशस्वीपणे पाठलाग केलेले सर्वोच्च लक्ष्य १९७६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे ४०३ आहे. तसेच भारताने २००८ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध यशस्वीपणे पाठलाग केलेले दुसरे सर्वोच्च लक्ष्य ३८७ आहे. या दोन्ही लक्ष्याच्या तुलनेत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेले लक्ष्य आतापर्यंतचे सर्वात मोठ लक्ष्य आहे. आता हे लक्ष्य भारतीय संघ पार करणार की नाही, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यामधये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा – IND vs AUS: मोहम्मद सिराजच्या वेगवान माऱ्यामुळं मार्नस लाबुशेन झाला जखमी, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाकडून २७० धावांवर डाव घोषित केला –

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हेड आणि स्मिथच्या शतकाच्या जोरावर १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकांच्या जोरावर ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकाच्या जोरावर ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावांवर डाव घोषित केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the highest target successfully chased by india in the history of test cricket find out vbm