Mumbai News Live Today, 29 June 2023: महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० जूनला वर्ष होईल. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुलाखत चर्चेत आहे. शरद पवारांनी डबलगेम केला. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला ही वक्तव्यं त्यांनी केली आहेत. त्याचप्रमाणे आपली २०२४ ला महत्त्वाकांक्षा काय आहे हे देखील बोलून दाखवलं आहे. या मुलाखतीवर विविध प्रतिक्रिया येण्याची चिन्हं आहेत. कोण कोण काय आरोप करणार, काय उत्तरं देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची पूजा केली. तसंच बळीराजाला सुखी कर असं साकडंही घातलं. तर राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची गेल्या ती दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. या आणि अशा सगळ्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Maharashtra News Live Today: “एकनाथ शिंदे माझे बॉस” असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस? यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी
“माझी महत्त्वाकांक्षा ही आहे की २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत ४२ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकणं आणि माझी दुसरी महत्त्वाकांक्षा आहे की विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करायचा या दोन महत्त्वाकांक्षा आहेत. राष्ट्रीय राजकारणात जाण्याची तूर्तास तरी इच्छा नाही. मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रासाठी काम करतोय.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० जूनला वर्ष होतंय. त्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.
गेल्या २४ तासात बदलापूर शहरात तब्बल २७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात झालेली ही सर्वाधिक नोंद आहे. त्या खालोखाल भिवंडीत २५७, मुंब्रा शहरात २३१ मिलिमीटर तर ठाणे शहरात २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारपर्यंत असाच पाऊस पडल्यास जून महिन्याची सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान! (फोटो – एएनआय)
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० जूनला वर्ष होईल. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुलाखत चर्चेत आहे. शरद पवारांनी डबलगेम केला. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला ही वक्तव्यं त्यांनी केली आहेत. त्याचप्रमाणे आपली २०२४ ला महत्त्वाकांक्षा काय आहे हे देखील बोलून दाखवलं आहे.