Mumbai News Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे गट-भाजपा आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपींसह सुमारे ४०० ते ५०० अज्ञातांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आहेत.
याशिवाय आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. यासंदर्भात तक्रार दाखल करून ४८ तासांत महिला आयोगाला अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य महिला आयोकाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हा विषयसुद्धा आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Marathi News Update :राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून सुषमा अंधारेंचा टोला, म्हणाल्या, “यांचे खरे चेहरे…”
कल्याण-डोंबिवली परिसरात शुक्रवारी सकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. कामावर, शाळेत निघालेल्या नोकरदार, विद्यार्थी, पालकांची तारांबळ उडाली. बाजारपेठांमध्ये उघड्यावर भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांची सामान झाकून ठेवण्यासाठी पळापळ झाली. सविस्तर वाचा…
मार्च महिन्यात मुंबईत १२ हजार ३५८ घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला १,१३७ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. नव्या वर्षातील आतापर्यंतची ही उंच्चांकी घर विक्री असली तरी २०२१ आणि २०२२ मधील मार्चच्या तुलनेत घर विक्रीचे हे प्रमाण कमी आहे.
उपराजधानीतील बऱ्याच औषध दुकानांमधून नियमबाह्यरित्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या सेवन केल्याने ५ टक्के महिलांमध्ये गुंतागुंत होते. त्यापैकी काही महिला अत्यवस्थही झाल्याचे निरीक्षण नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक ॲण्ड गायनॉकॉलाजिकल सोसायटीने (एनओजीएस) नोंदवले आहे.
पुणे-नागपूर मार्गावर वर्षभरच रेल्वेचे ‘कन्फर्म’ तिकीट मिळणे अवघड आहे. उन्हाळ्यात तर त्यात आणखी गर्दीत भर पडते. हे लक्षात घेऊन रेल्वेने अजनी-पुणे-अजनी दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे. तसंच नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणून दिले नाहीत असा आरोप केला आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
शिंदे सरकारविरोधात महाविकास अघाडीकडून संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिली सभा येत्या २ एप्रिलरोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडेल. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सभेवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
संभाजीनगरमध्ये दंगल होऊच द्याची नाही, अशी सामंजस्याची भूमिका दोन्ही गटाच्या लोकांनी घेतली होती. पण २ एप्रिलला महाविकास आघाडीची संभाजीनगर येथे सभा होणार आहे. ती सभा होऊ नये, कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली सभेला परवानगी मिळू नये, म्हणून दंगली घडवल्या जात आहेत, दंगल घडवणं हे सरकारच्या नपुंसकतचं लक्षण आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे आदेश देऊन ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.