Mumbai Maharashtra News Today : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये काही जागांवरून मतभेद असल्याचे कळते. शिंदे गटाने हिंगोलीसाठी हेमंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र आता येथील उमेदवार बदलला जाण्याची चर्चा आहे. तसेच अद्याप नाशिक, यवतमाळ आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. हे मतदारसंघ भाजपाकडे जाणार की शिंदे गट याठिकाणी विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून इतरांना उमेदवारी देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अकोला येथून काँग्रेसने उमेदवार दिला आहे. त्यामुळे आंबेडकर काय भूमिका घेणार, हेही पाहावे लागेल.
Maharashtra News Live Updates 02 April 2024
नागपूर: कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेकडे होती आणि राहिलही ,असा दावा करीत ही जागा आम्ही अडिच लाख मतांनी जिंकू, असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात यातही मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
पैठणनगरीतील संत एकनाथ महाराजांच्या वंशांजामधील वाद सोमवारी मध्यरात्री नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकी दरम्यान उफाळून आला.
फ्लॅट, जमिनीचे दर स्थिर राहण्याचे संकेत असल्याने त्यांची विक्री वाढून या क्षेत्राला बळ मिळण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, प्रहारचे बच्चू कडू आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांनी विरोधी भूमिका घेतली.
नीती आयोगाच्या अहवालानुसार, देशातील बहुआयामी गरिबी २०१३-१४ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २९.१७ टक्के होती.
अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना उतरवले आहे.