फडणवीसांऐवजी विनोद तावडे असतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा? भाजपाच्या अंतर्गत गटबाजीवर तावडेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

भावी मुख्यमंत्री म्हणून विनोद तावडे प्रमुख चेहरा असतील, अशी चर्चा सुरू आहे.

vinod tawde and devendra fadnavis
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद तावडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यास पक्षाने नकार दिला होता. पक्षाने तिकीट डावलल्यानंतर विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवस अदृश्य झाले होते. पण त्यानंतर त्यांना केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी तावडे यांना देण्यात आली. अलीकडेच तावडे यांनी २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशची जबाबदारी सांभाळली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

केंद्रीय राजकारणातील विनोद तावडे यांची कामगिरी पाहता ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होतील. विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांना डावलून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे. याबाबत प्रश्न विचारला असता विनोद तावडे यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही रस नाही. आता ‘ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र’ असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं. ते ‘एबीपी माझा’च्या एका मुलाखतीत बोलत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याच्या चर्चेबद्दल विचारलं असता विनोद तावडे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येण्याचा माझा मानस नाही. आता ‘ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र’. केंद्रीय स्तरावर राजकारण करताना तुम्हाला खूप शिकायला मिळतं. तुमची दृष्टी एकदम व्यापक होते. त्यामुळे मला मनापासून केंद्रातच काम करायला आवडेल,” असं उत्तर विनोद तावडेंनी दिलं.

हेही वाचा- “मी अपघाताने राजकारणात आलो”, सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य

भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात तुमचा चेहरा असेल का? या सोशल मीडियावरील चर्चेबाबत विचारलं असता विनोद तावडे म्हणाले, “यामध्ये अजिबात तथ्य नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांची एक टीम आहे. हेच लोक टीम म्हणून महाराष्ट्रात काम करतील. मला महाराष्ट्रात येण्यात काहीही रस नाही, हे मी मनापासून सांगतो. मला केंद्रातल्या राजकारणातच काम करायला आवडेल.”

हेही वाचा- “…तेव्हा ‘लोकसत्ता’ माझ्यासाठी खूप मोठा होता”, राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा

भाजपातील अंतर्गत कुरघोडी, गटबाजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या वादाबाबत विचारलं असता तावडे म्हणाले, “यात अजिबात तथ्य नाही. भाजपात दोन गट किंवा अमुक ग्रुप, तमुक ग्रुप असं अजिबात नाही. हे मी मनापासून सांगतोय, केवळ कॅमेरा समोर आहे म्हणून बोलतोय असं नाही. भाजपाची काम करण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे आम्ही सगळे मिळून भाजपा महाराष्ट्रात मजबूत कसा होईल? यासाठी काम करत आहोत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 22:49 IST
Next Story
नाशिक : अंधारातच अब्दुल सत्तार बांधावर; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
Exit mobile version