अखेर १८ वर्षांची प्रतीक्षा संपली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाने आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. आरसीबीने यावेळी पंजाब किंग्जचा पराभव केला. RCB ने अंतिम सामना सहा धावांनी जिंकला.

सामना अगदी शेवटच्या टप्प्यात आला तेव्हा विराटला आपले अश्रू रोखता आले नाहीत आणि विजयाची आवाक्यात आल्याचे दिसू लागल्यावर तो रडू लागला. स्टेडियममध्ये उपस्थित असलेली त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील सुरुवातीला आनंदाने उड्या मारत होती; पण नंतर तिच्याही डोळ्यांत पाणी आले.

आरसीबीने १८ वर्षांनंतर आयपीएल जिंकल्यानंतर सुनील शेट्टीही भावूक झाला. त्याने विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये विजयानंतर दोघेही खूप भावूक दिसत आहेत आणि विराट अनुष्काच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. सुनील शेट्टीने या व्हिडीओवर अनुष्काच्या ‘सुलतान’ चित्रपटाचे गाणे टाकले आहे.

सुनील शेट्टीने लिहिले आहे, “१८ वर्षे, असंख्य धावा, विश्वास आणि… अखेर नशीब चमकले.” विराट कोहली – आयपीएलला सर्वात जास्त लोकप्रियता देणारा माणूस – अखेर ट्रॉफी जिंकली, त्याने मनापासून, हृदयात आणि आत्म्यात आग लावून त्याचा पाठलाग केला. हा फक्त विजय नाही, तर ही एक अशी प्रेमकहाणी आहे, ज्यावर प्रसिद्धीचा शिक्का बसला आहे. सुनील शेट्टीच्या या पोस्टवर ‘जग घूमया’ हे गाणे वाजत आहेत.

सुनील शेट्टीची ही पोस्ट अनुष्का शर्मानेही लाईक केली आहे. क्लिपमध्ये दिसत आहे की, विजयानंतर विराट अनुष्काकडे धावत आहे. अनुष्काही आनंदाने त्याच्याकडे धावत आहे. त्यानंतर दोघेही काही वेळ एकमेकांना मिठी मारून थांबतात. त्यानंतर विराट अनुष्काच्या कपाळावर किस करतो. विराट आणि अनुष्काचे असे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक त्यांच्या प्रेमाचे आणि बंधनाचे कौतुक करत आहेत. हा क्षण प्रत्येक चाहत्यासाठी भावनिक होता.

अनुष्का आणि विराटची पहिली भेट ही एका जाहिरातीच्या शूटिंगच्या निमित्ताने झाली होती. दोघेही एका सेटवर भेटले आणि आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले. काही काळ डेट केल्यानंतर अनुष्का-विराटने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. अगदी मोजक्या लोकांमध्ये त्यांनी त्यांना हवा तसा लग्नसोहळा एन्जॉय केला.