कंगना रणौत ही तिच्या लाजवाब अभिनय आणि बेधडक स्वभावामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटीजम आणि माफियाबद्दल उघडपणे भाष्य करायला सुरुवात केली. याबरोबरच कंगना तिची राजकीय मतंदेखील परखडपणे मांडत असते. नुकतंच एका पोस्टमधून तिने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध जोडप्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या इंस्टा स्टोरीवर कंगनाने बॉलिवूडच्या एका लाडक्या जोडप्याबद्दल आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. कंगना लवकरच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसह एका चित्रपटात झळकणार आहे, ही बातमी समोर येताच काही लोकांनी नेहमीप्रमाणे कंगनाला ट्रोल करायला सुरुवात केली.

आणखी वाचा : ‘बजरंगी भाईजान’च्या सीक्वलबद्दल मोठी अपडेट; करीना कपूर ऐवजी लागणार ‘या’ अभिनेत्रीची वर्णी

कंगनाच्या विरोधात आलेल्या या बातम्या सगळ्या सारख्याच आहेत आणि त्यासाठी तिने या जोडप्यालाच दोष दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये कंगनाने बॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडीला खडेबोल सुनावले आहेत. कंगनाने नाव जरी घेतलं नसलं तरी ती रणबीर कपूर आणि आलिया भट्टबद्दल बोलत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. आपल्या पोस्टमध्ये कंगनाने या लोकप्रिय जोडप्याने केलेलं लग्न खोटं आहे, माफियाच्या दबावाखाली येऊन त्यांनी लग्न केल्याचं स्पष्ट केलं आहे.

फोटो : सोशल मीडिया
फोटो : सोशल मीडिया

इतकंच नव्हे तर त्या लोकप्रिय अभिनेत्याने चित्रपटाच्या ऑफर खातर हे लग्न केलं आहे आणि हे जोडपं लग्न होऊनही वेगवेगळं राहतं असंही कंगनाने तिच्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्या लोकप्रिय अभिनेत्याकडे आता हे लग्न निभावण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही असंही कंगनाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. याआधीही कंगनाने बऱ्याचदा रणबीर आणि आलियाबद्दल टिप्पणी केली आहे. कंगना लवकरच ‘इमर्जन्सि’ चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut takes a dig at popular bollywood couple ranbir kapoor alia bhatt avn