विद्या बालनने तिच्या कारकिर्दीत अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे आणि त्या सर्वांबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव चांगला राहिला आहे. विद्या बालन ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींनपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
पण तुम्हाला माहिती आहे का की, एकदा विद्याने अक्षय खन्नाबरोबर काम करण्यास नकार दिला होता आणि जेव्हा ती वर्षानंतर दुसऱ्या चित्रपटाच्या सेटवर अक्षयला भेटली, तेव्हा ती त्याला इतकी घाबरली की तिने जॉन अब्राहमला तिला वाचवण्यास सांगितले.
विद्या बालनने चित्रपट का नाकारला होता?
बॉलीवूड हंगामाशी बोलताना विद्या म्हणाली, “मला अक्षय खन्नाबरोबर एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता, पण काही कारणास्तव मी स्क्रिप्टशी कनेक्ट होऊ शकले नाही आणि चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या मॅनेजरला सांगितले की मी चित्रपट करणार नाही हे दिग्दर्शकाला सांगावे आणि मी त्यांचे फोन उचलले नाहीत.
विद्या पुढे म्हणाली, “यानंतर मी अक्षयला ‘सलाम ए इश्क’ चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि तो म्हणाला की तू मला का सांगितलं नाहीस की तुला हा चित्रपट करायचा नाही? मी जॉन अब्राहमकडे गेले आणि म्हणाले की कृपया मला वाचव, कारण मी नवीन होते आणि मला त्याचा सामना करायचा नव्हता. मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या किंवा कोणालाही असे वाटू द्यायचे नव्हते की मी त्याच्याबरोबर काम करू इच्छित नाही. पण, नंतर मला कळले की तो माझी चेष्टा करत होता.”
विद्या पुढे म्हणाली, “मी उद्धट व्यक्ती नाही, मी फक्त नाही म्हणाले कारण मला ते बरोबर वाटले. पण, मला समजते की पटकथा तयार करण्यासाठी किती वेळ लागतो आणि मी त्याची कदर करते.”
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने सीरिजमध्ये तसेच चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. विद्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘भूल भुलैया ३’मध्ये दिसली होती, जो एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत होते.