बॉलीवूडचे अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करताना अपार कष्ट आणि मेहनत केली आहे. खिशात पैसे नसताना मेहनत करून स्वबळावर नाव कमावलं. असाच एक इंडस्ट्रीमधला अभिनेता आहे, तो म्हणजे विजय वर्मा.

विजय वर्मा हा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चा विद्यार्थी आहे. ‘मिर्झापूर’, ‘दहाड’ आणि ‘डार्लिंग्ज’सारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट कामाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. अभिनेता विजय वर्माने आता त्याच्या आयुष्यातील एक मनोरंजक किस्सा सांगितला आहे, ज्यामुळे त्याचे नशीब बदलले.

अभिनेत्याने सांगितले की, त्याने येथे गुप्तपणे अर्ज केला होता आणि निवड झाल्यानंतर घरातून पळून गेला होता. अभिनेत्याने सांगितले की त्याने त्याच्या पालकांना न सांगता फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अर्ज केला होता आणि जेव्हा त्यांना ही बातमी मिळाली तेव्हा ते त्यावर खूश नव्हते. तो इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी घरातून पळून गेला होता.

विजय फराह खानच्या यूट्यूब चॅनेलवर दिसला, जिथे त्याने आयुष्याशी तसेच त्याच्या कारकिर्दीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. जेव्हा फराहने विजयला विचारले की तो हैदराबादहून मुंबईत कसा आला, तेव्हा अभिनेत्याने उत्तर दिले, “मी तिथून पळून आलो.” सहसा लोक घरातून पळून जातात आणि मग काय करावे याचा विचार करतात. पण, मी फिल्म स्कूलमध्ये अर्ज केला आणि तिथे माझी निवड झाली. माझ्या आई-वडिलांना या बातमीने आनंद झाला नाही म्हणून मी तिथे पोहोचण्यासाठी मित्रांची मदत घेतली.

आई आणि बाबा आता आनंदी आहेत.

फराह खानने त्याच्या पालकांच्या प्रतिक्रियेवर प्रश्न विचारले, ज्यावर तो म्हणाला, ‘ विशेषतः माझे वडील या निर्णयाविरुद्ध होते. जेव्हा त्यांना ही बातमी मिळाली, तेव्हा त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पण, आता ते माझ्या निर्णयावर खूश आहेत. त्याला विचारले की, त्याने कोणताही दक्षिण भारतीय चित्रपट साइन केला आहे का, तेव्हा तो म्हणाला, “मी बऱ्याच वर्षांनी तेलुगू चित्रपट साइन केला आहे.”

विजयने २०१६ मध्ये आलेल्या ‘पिंक’ या क्राइम-ड्रामामध्ये काम केले होते. या चित्रपटात तापसी पन्नू, अमिताभ बच्चन, अंगद बेदी आणि इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याने रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या २०१९ मध्ये आलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटातही काम केले होते, ज्यासाठी त्याचे खूप कौतुक झाले होते. यानंतर तो ‘मिर्झापूर’, ‘दहाड’, ‘डार्लिंग्ज’, ‘कालकूट’, ‘जाने जान’ आणि ‘आयसी ८१४: द कंधार हायजॅक’सारख्या प्रोजेक्टचाही भाग होता.