Premium

१०० हून जास्त कामगार असल्यास उपाहारगृह बंधनकारक; नव्या कामगार नियमांना मान्यता

शंभरपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांमध्ये उपाहारगृह आणि ५० पेक्षा अधिक कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यांमध्ये महिला कामगारांसाठी पाळणाघराची सुविधा आता बंधनकारक आहे.

canteen workers
१०० हून जास्त कामगार असल्यास उपाहारगृह बंधनकारक

मुंबई : शंभरपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांमध्ये उपाहारगृह आणि ५० पेक्षा अधिक कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यांमध्ये महिला कामगारांसाठी पाळणाघराची सुविधा आता बंधनकारक आहे. यासंदर्भातील चौथ्या कामगार संहितेच्या नवीन नियमांना राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र शासनाने २९ कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता तयार केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामगारांची व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता २०२० या चौथ्या संहितेस मान्यता देण्यात आली. नव्या संहितेच्या नियमानुसार राज्यात यापुढे १०० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांमध्ये उपाहारगृहाची तसेच ५० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात पाळणाघराची व्यवस्था बंधनकारक राहणार आहे. २५० पेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या कारखान्यात कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Canteen is compulsory if there are more than 100 workers amy