मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत राज्यात वाढ झाली आहे. मुंबईतील रेल्वेत दिवसाढवळय़ा मुली-तरुणीवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्याच्या गृहखात्याची निष्क्रियता या प्रकाराला जबाबदार आहे. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबद्दल हे सरकार गंभीर नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत धावत्या रेल्वेत विनयभंगाची घटना घडली आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याला गृहखात्याची उदासीनता कारणीभूत ठरली आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule opined that the government is not serious about the oppression of women mumbai amy