मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवादी कारवायांसाठी अटक केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात काढलेल्या मोर्चात ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्ला हूँ अकबर’सारख्या घोषणा देण्यात आल्या. ही प्रवृत्ती सरकारने वेळीच ठेचली पाहिजे, अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भारताला ‘मुस्लीम राष्ट्र’ बनवण्याचा कट; ‘पीएफआय’बाबत ‘एनआयए’चा दावा : तरुणांना दहशतवादी कारवायांत ओढण्याचे प्रयत्न  

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे याबाबत गप्प का राहिले, पीएफआयविरोधात त्यांनी भूमिका का घेतली नाही, असा सवाल भाजपचे आशीष शेलार यांनी केला. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करणे, प्रशिक्षण देणे यामध्ये सहभागी असलेल्यांना एनआयएने अटक केली आहे. त्यांचे समर्थन करणाऱ्यांना यात धर्म व पाकिस्तान आठवत असेल, तर त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tendency proclaim pakistan zindabad bjp mns demand ysh
First published on: 25-09-2022 at 00:36 IST