नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही उजव्या विचारांची संघटना आहे. संघाकडून कायम राष्ट्रवादी भूमिका मांडली जाते. भारतीय जनता पक्षाची मातृसंघटना म्हणूनही संघ ओळखला जातो. अशातच संघाने काँग्रेसच्या बड्या नेत्याला श्रद्धांजली वाहिल्याची बाब समोर आल्याचे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक बेंगळुरू येथे सुरू आहे. ही बैठक पुढील तीन दिवस सुरू राहील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत संघाशी संबंधित ३२ संघटनांचे सुमारे १४८० प्रतिनिधी सहभागी होतील.

बांगलादेशातील हिंदू छळ आणि शताब्दी वर्षाबद्दल बैठकीत ठराव मंजूर केले जाणार आहेत. संघाचे सहसरचिटणीस मुकुंद सी.आर. यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आमची तीन दिवसांची बैठक सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सुरू केली आहे. आम्ही, संघाने, समाजात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. सह-सरकार्यवाह म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १० हजार अधिक शाखा स्थापन होण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

देशातील ५८,९८१ जिल्ह्यांमध्ये काम पूर्णपणे सुरू झाले आहे, असे त्यांनी सांगितले. विभागात ३०,७७० लोक आठवड्याचे काम करत आहेत. यामध्ये विभागीय स्तरावर ९२०० साप्ताहिक शाखांचे आयोजन केले जात आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत एकूण १२ लाख ७ हजार ४३ जणांनी आरएसएसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये सुमारे ४६००० महिलांनी संस्थेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

यांनाही श्रद्धांजली वाहिली

स्वामी प्रणवानंद, शिरीष महाराज मोरे, मनमोहन सिंग, झाकीर हुसेन,खासदार वासुदेव नायर, श्याम बेनेगल, प्रीतिश नंदी, एस. एम. कृष्णा,कामेश्वर चौपाल, तुलसी गौडा, शंकर दत्तवाडी, देवेंद्र प्रधान, विवेक देवराय.

या दोन प्रस्तावांवर चर्चा होणार

या वर्षी संघाच्या स्थापनेचा १०० वा वर्धापन दिन आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत, संघाच्या कार्याच्या विस्तारावर चर्चा केली जाईल. विजयादशमी २०२५ ते विजयादशमी २०२६ पर्यंत ते शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाईल. तीन दिवसांच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत दोन प्रस्तावांवर चर्चा केली जाईल. पहिला प्रस्ताव बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचारांची परिस्थिती आणि भविष्यातील उपाययोजना यावर असेल. दुसरा प्रस्ताव संघाचा गेल्या १०० वर्षातील प्रवास, शताब्दी वर्षातील उपक्रम आणि भविष्यातील योजनांवर असेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss pays tribute to ex pm manmohan singh and world famous tabla player zakir hussain in bangalore meeting dag 87 zws