Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. dcm ajit pawars statement on the allegations of changing the constitution ani interview spl

Lok Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं संविधान बदलण्याच्या आरोपांवर वक्तव्य म्हणाले “स्वत: काही करायचं…”

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संविधान बदलण्याच्या आरोपांवर भाष्य केले आहे.

Updated: April 30, 2024 18:28 IST
Follow Us
  • ajit pawar latest news
    1/10

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.

  • 2/10

    या मुलाखतीत अजित पवार यांनी काँग्रेस पक्ष हा सोयीचं राजकारण करतो असं म्हटलं आहे.

  • 3/10

    आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास संविधानात बदल करण्यात येईल, असा वादा काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

  • 4/10

    महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असून हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

  • 5/10

    त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

  • 6/10

    “काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांना विरोध केला. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनेच त्यांचा पराभवही केला होता. मुळात काँग्रेसने कधीही संविधान दिवस साजरा केला नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली”, असे अजित पवार म्हणाले.

  • 7/10

    “स्वत: काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी काही केलं, तर त्यांच्या विरोधात चुकीचा प्रचार करायचा, ही काँग्रेसची पद्धत आहे”, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.

  • 8/10

    “तसेच आपल्या देशातील संविधान उत्तम आहे. ते संविधान कोणीही बदलू शकत नाही. हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ४०० जागा जिंकल्यावर भाजपा संविधान बदलेल, हा आरोप चुकीचा आहे. यात कोणतेही तथ्य नाही”, असेही ते म्हणाले.

  • 9/10

    (सर्व फोटो साभार- अजित पवार/फेसबुक पेज)

  • 10/10

    हेही पहा- “आत्मा अस्वस्थ आहे, पण..” शरद पवारांनी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर!

TOPICS
अजित पवारAjit Pawarभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशिवसेनाShiv Sena

Web Title: Dcm ajit pawars statement on the allegations of changing the constitution ani interview spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.