-
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषण केल्यामुळे चर्चेत आलेल्या मनोज जरांगेंची पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
-
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात बीड आणि जालना या ठिकाणी आज मतदान पार पडतं आहे.
-
४ जूननंतर मनोज जरांगे सभा घेऊन ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
-
काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
-
काय म्हणाले मनोज जरांगे?
” मी ८ जून रोजी नारायणगड या ठिकाणी भव्य सभा घेतो आहे. १५ मेच्या दिवशी मी तिथल्या जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर, राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांना या विराटसभेसाठी आवाहन करण्यात येईल. -
“या सभेला सहा कोटी मराठा बांधव या ठिकाणी येतील. १५ मेच्या पाहणीनंतर सभेविषयी मी अंतिम निर्णय घेणार आहे.”
-
तसंच,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना “चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
-
चंद्रकांत पाटील यांच्याबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?
चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं आहे? त्यांना काय कळतं. फक्त ‘तेरे नाम; भांग पाडून हिंडत असतात, स्वतःची ३७ मतं तरी त्यांना पडतात का?, असं म्हणत मनोज जरांगेंनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
मनोज जरांगेंची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका! म्हणाले, “त्यांना काय कळतं? स्वतःची ३७ मतं….”
मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. (सर्व फोटो मनोज जरांगे पाटील या फेसबुक पेजवरुन साभार.)
Web Title: Manoj jarange patil latest news comments on chandrakant patil maratha reservation committee member