-
साउथचे लोकप्रिय कपल नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभु यानी अखेर विभक्त होत असल्याचं जाहीर केलंय.
-
समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत होत असल्याचं जाहीर केलंय. या बातमीने चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
-
समांथा आणि नागा चैतन्यने त्यांच्या पोस्टमध्ये खूप विचार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
-
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ सालामध्ये समांथा आणि नागा चैतन्याने गोव्यामध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं.
-
अवघ्या चार वर्षात दोघं विभक्त होत आहेत.
-
समांथा आणि नागा चैतन्याची लव्हस्टोरी देखील खास होती.
-
२००९ सालामध्ये ‘ये माया चेसवे’ या सिनेमाच्या सेटवर समांथा आणि नागा चैतन्यची पहिली भेट झाली. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली होती
-
. मात्र यावेळी दोघंही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते.
-
नागा चैतन्य यावेळी श्रुती हसनला डेट करत होता. तर समांथा सिद्धार्थला.
-
२०१३ सालात नागा चैतन्य आणि श्रुतीचं ब्रेकअप झालं. तर समांथा आणि सिद्धार्थमध्ये देखील फूट पडली
-
२०१४ सालामध्ये सुर्या सिनेमात दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. यावेळी मात्र त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
२०१५ सालामध्ये नागा चैतन्यला समांथाने सोशल मीडियावरून त्याला वाढदिवसानिमित्ताने क्यूट मेसेज लिहित शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याच्या चर्चांना अधिक रंग चढला.
-
“”माझ्या कायमच आवडत्या असलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे एक उत्तम वर्ष असणार आहे.” असं ती ट्वीटमध्ये म्हणाली होती.
-
तर नागा चैतन्यने २०१६ सालामध्ये एका रोमॅण्टिक ट्रिपवर समांथाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.
-
नागा चैतन्यने सर्वात आधी वडिलांना म्हणजेच नागार्जुन यांना त्याच्या आणि समांथाच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.
-
२०१७ सालामध्ये समांथा आणि नागा चैतन्यने गोव्यामध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं.
-
६ ऑक्टोबर २०१७ ला त्यांनी हिंदू प्रथेप्रमाणे लग्न केलं
-
तर दुसऱ्या दिवशी त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.
-
दोघांच्या या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
-
समांथा आणि नागा चैतन्याच्या लग्नाएवढीच चर्चा त्यांच्या हनीमूनची झाली. तब्बल ४० दिवस त्यांनी हनीमून एन्जॉय केलं
-
लग्नानंतर संपूर्ण जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याचं त्यांनी ठरवलं होतं.
-
या क्यूट कपलच्या विभक्त होण्याने त्यांच्या चाहत्यांना दु:ख आहे.
-
समांथा आणि नागा चैतन्याच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी समांथाच्या करियरमुळे दोघांमध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
-
समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सासरचं नाव काढून टाकल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं.
-
त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये तसचं नागा चैतन्यच्या ‘लव्हस्टोरी’ सिनेमाच्या लॉन्च सोहळ्यात समांथाची गैरहजेरी दिसून आली.
-
समांथा आणि नागा चैतन्यने विभक्त होण्याचा निर्णय अखेर सर्वांसमोर जाहीर केला. तसचं चाहत्यांनी साथ द्यावी असं त्यांनी यावेळी म्हंटलंय.
जीवापाड प्रेम, शाही विवाह, ४० दिवसांचं हनीमून तरीही चार वर्षात काडीमोड, समांथा-नागा चैतन्यची ‘लव्हस्टोरी’
Web Title: Samantha ruth prabhu naga chaitanya love story get divorce after 4 years kpw