• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rss vijayadashmi melava held in reshimbag ground of nagpur rss chief mohan bhagwat speech and parade photos rvs

PHOTOS: “देशात धार्मिक असंतुलन, घुसखोरी मोठ्या समस्या”, वाचा सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Updated: October 5, 2022 12:49 IST
Follow Us
  • नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे सरसंघचालकांनी निरीक्षण केले.
    1/15

    नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे सरसंघचालकांनी निरीक्षण केले.

  • 2/15

    या सोहळ्यात आरएसएसच्या स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. यावेळी विविध कवायती सादर करण्यात आल्या. या सोहळ्याला हजारो स्वयंसेवकांनी उपस्थिती लावली होती.

  • 3/15

    संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचा गौरव केला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संतोष यादव या महिलेला स्थान देण्यात आले.

  • 4/15

    “पुरुष श्रेष्ठ की महिला हा वाद आम्ही करत नाही. महिलांना घरात ठेवणं योग्य नाही. समाजात दोघांचेही काम परस्परपुरक आहे” असे सरसंघचालक या सोहळ्यात म्हणाले आहेत.

  • 5/15

    देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे.

  • 6/15

    देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी मोहन भागवत यांनी केली आहे.

  • 7/15

    भारताचे ऐक्य आणि प्रगती सहन न होणाऱ्या शक्ती नवनिर्माणाच्या प्रक्रियेतील मोठा अडथळा आहेत. या शक्तींना उखडून टाकण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना समाजाने साथ द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • 8/15

    आरोग्य सेवेच्या परवडणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि नफेखोरीमुक्त अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे संघाने सरकारला सुचवल्याची माहिती भागवत यांनी दिली आहे.

  • 9/15

    प्रत्येक जिल्ह्यात रोजगार प्रशिक्षणाच्या विकेंद्रित योजना राबवण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, असे आवाहन भागवत यांनी सरकारला केले आहे.

  • 10/15

    मंदिर, पाणी आणि स्मशाने जोवर सर्व हिंदूंसाठी खुली होत नाहीत, तोवर समता हे केवळ स्वप्नच राहणार आहे, असे भागवत यांनी म्हटले आहे.

  • 11/15

    लोकसंख्या ही समस्या आहे. मात्र या समस्येचा दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा. या लोकसंख्येचा योग्य उपयोग केल्यास देशाला फायदा होऊ शकतो, असे सरसंघचालक म्हणाले आहेत.

  • 12/15

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कृपाल तुमानेंसह इतर भाजपा नेत्यांनी या सोहळ्यात हजेरी लावली.

  • 13/15

    जन्मदरातील विषमतेबरोबरच, लोभ, लालसा, सक्तीचे मतपरिवर्तन, घुसखोरी या मोठ्या समस्या असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.

  • 14/15

    नागपुरातील विजयादशमी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

  • 15/15

    (फोटो सौजन्य- धनंजय खेडकर, एक्स्प्रेस)

TOPICS
आरएसएसRSSआरएसएस प्रमुख मोहन भागवतRSS Chief Mohan Bhagwatदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनितीन गडकरीNitin Gadkari

Web Title: Rss vijayadashmi melava held in reshimbag ground of nagpur rss chief mohan bhagwat speech and parade photos rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.