-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ ठेऊनही त्यावर चर्चा होत नसल्यावर नाराजी व्यक्त केली.
-
यावेळी त्यांनी एवढे प्रयत्न करूनही लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? या प्रश्नावरही आपली भावना व्यक्त केली.
-
तसेच प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान आणि सलमान खानचं नाव घेत राजकीय टोलेबाजी केली.
-
ते मंगळवारी (२४ जानेवारी) ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.
-
राज ठाकरे यावेळी नेमकं काय बोलले त्याचा हा आढावा…
-
अपेक्षित मतदान झालं नाही की मला राग येत नाही, मात्र वाईट वाटतं- राज ठाकरे
-
वाईट या गोष्टीचं वाटतं की, एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही जर पदरात काही पडत नसेल तर वाईट वाटतं- राज ठाकरे
-
वाईट वाटतं कारण त्यामागे फार विचार असतो, मेहनत असते – राज ठाकरे
-
आमचं शाहरूख खान, सलमान खानसारखं नाही – राज ठाकरे
-
त्यांचा एक चित्रपट पडला तर लगेच दुसरा सुरू करू शकतात. मात्र, आमचं असं नाही – राज ठाकरे
-
आमचा एक चित्रपट संपला की लगेच सुरू करता येत नाही – राज ठाकरे
-
आमचा पाच वर्षांनीच सुरू होतो – राज ठाकरे
-
हे आमच्या हातात नसल्यामुळे पुन्हा ती पाच-पाच वर्षे जातात – राज ठाकरे
-
एक उमेदीचं वय असतं, उमेदीचा काळ असतो – राज ठाकरे
-
तुम्हाला या राज्यासाठी काही तरी नवीन करून दाखवावं वाटत असतं – राज ठाकरे
-
माझी ती इच्छा, आशा, आकांक्षा आहे. आमची सर्वांचीच आहे – राज ठाकरे
-
महाराष्ट्राने लवकरात लवकर ती गोष्ट हातात द्यावी – राज ठाकरे
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
Photos: लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? राज ठाकरे म्हणाले, “एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही…”
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? या प्रश्नासह अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्याचा हा आढावा…
Web Title: Mns chief raj thackeray important statements on maharashtra politics blue print shahrukh khan salman khan pbs