-
हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर गंभीर आरोप झाले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी विधानं केली आहेत.
-
पवार शुक्रवारी (७ एप्रिल) एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यावेळ त्यांनी हिंडेनबर्ग-अदाणी प्रकरणात नेमकी काय वक्तव्यं केली त्याचा हा आढावा…
-
एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली. अशाप्रकारची वक्तव्ये याआधीही काही लोकांनी दिले होते. काही दिवस संसदेत यावरून गदारोळही झाला होता – शरद पवार
-
आम्ही तर या कंपनीचं कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी काय माहिती नव्हतं – शरद पवार
-
अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते हे दुर्लक्षित करता येणार नाही – शरद पवार
-
हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं – शरद पवार
-
या प्रकरणाच्या तपासात स्वतः सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला. त्यांनी समिती नियुक्त केली – शरद पवार
-
त्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, जाणकार, तज्ज्ञ अशा लोकांचा समावेश आहे. त्यांना मार्गदर्शक सूचना आणि वेळ देण्यात आला – शरद पवार
-
तसेच याचा तपास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं – शरद पवार
-
दुसरीकडे विरोधी पक्षांची मागणी होती की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची नियुक्त करा – शरद पवार
-
जर संसदेची समिती नियुक्त केली, तर आज संसदेत बहुमत सत्ताधारी पक्षाचं आहे. ही मागणी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातीलच आहे – शरद पवार
-
अशावेळी सत्ताधारी भाजपाशी संबंधित विषयाची चौकशी करणाऱ्या समितीत भाजपाचं बहुमत राहिलं असतं. त्यामुळे सत्य बाहेर येणार की नाही याविषयी संशय निर्माण होऊ शकतो – शरद पवार
-
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा विचार केला, तर तिथं सत्ताधारी किंवा विरोधकांशी संबंधित कुणी नाही. त्यांनी चौकशी केली तर अधिक सत्य देशासमोर येईल – शरद पवार
-
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तपास करण्याची घोषणा केल्यानंतर संसदेच्या समितीकडून याची चौकशी करण्याला महत्त्व राहिलं नाही, त्याची आवश्यकता राहिली नाही – शरद पवार
-
विषय व्यक्तिगत झाले आणि काही महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्षही करण्यात आलं – शरद पवार
-
संसदेत कोणत्या विषयावर जास्त संघर्ष करण्याची आवश्यकता असते, तर देशवासीयांसमोर काय प्रश्न आहेत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत – शरद पवार
-
बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि असे अनेक प्रश्न आहेत – शरद पवार
-
एखाद दुसऱ्या दिवशी राजकीय विषय येतात. मात्र, जे सामान्य लोकांना त्रास देणारे मुद्दे आहेत त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही – शरद पवार
-
ज्वलंत विषय संसदेत उपस्थित न करण्यासाठी मी कोणत्याही एका पक्षाला दोष देणार नाही. कारण यात केवळ काँग्रेस पक्ष नव्हता, तर डावे आणि इतर पक्षही यात होते – शरद पवार
-
सर्वांनी मिळून महत्त्वाचे विषय बाजूला करून राजकीय विषयांना जास्त महत्त्व देण्यात आलं. त्यामुळे सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं – शरद पवार
-
तुम्ही ज्या कुणावर टीका करत असाल, टार्गेट करत असाल त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने अधिकार वापरले असतील तर त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला लोकशाहीने दिला आहे हे १०० टक्के मान्य आहे – शरद पवार
-
पण काहीही अर्थ नसताना उगाचच हल्ला करायचा, हे मला समजू शकत नाही – शरद पवार
-
पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानी यांनी मोठं योगदान दिलं आहे देशाला त्याची गरज नाही का? वीज क्षेत्रात अदाणी यांचं मोठं योगदान आहे देशाला वीज लागणार नाही का? – शरद पवार
-
देशाच्या गरजा लक्षात घेऊन देशाचं नाव त्या क्षेत्रात उंचावणारे हे लोक आहेत – शरद पवार
-
धारावीत अनेक लघुउद्योग आहेत, तिथले लोक वेगळे आहेत. विविध प्रकारचे व्यवसाय करतात, उद्योगधंदे चालवतात – शरद पवार
-
अशा लोकांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळणं आवश्यक आहे, त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढेल. तसेच या भागासाठीही ती फायद्याची बाब आहे – शरद पवार
-
मुंबईत आल्यानंतर विमानातून उतरल्यावर धारावीच्या झोपडपट्ट्या दिसतात हा गैरसमज लवकरच दूर होईल. धारावीचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून तिथे सुरू आहे. त्यामुळे मला वाटते ती चांगली गोष्ट आहे – शरद पवार
-
मला संसदेत येऊन जवळपास ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. संसद आणि विधानसभेत मी अनेक गोष्टी सातत्याने केल्यात, बऱ्याचदा गोंधळ पाहिला आहे – शरद पवार
-
पण हा प्रकार घडल्यानंतर संध्याकाळी चर्चा सुरू व्हायची, दुसऱ्या दिवशी सकाळी संसदीय कामकाज मंत्र्यांची जबाबदारी असते की, सभागृहात कोंडी फोडून त्यावर चर्चा घडवून आणायची – शरद पवार
-
दुसऱ्या दिवशी बसून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न व्हायचा. पण आता तसं काही दिसत नाही. चर्चेची ही प्रक्रिया आजकाल होतच नाही – शरद पवार
-
मला आठवते गुलाम नबी आझाद संसदीय कामकाज मंत्री होते, तेव्हा विरोधी पक्ष खूप मजबूत होता. अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही – शरद पवार
-
मात्र गुलाम नबी आझाद हे विरोधी पक्षनेत्यासोबत बसून काही तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचे आणि सभागृहाचे कामकाज चालूच असायचे – शरद पवार
-
आजकाल जसा टोकाचा संघर्ष करणं योग्य नाही, तसंच चर्चेची प्रक्रिया थांबवणंही योग्य नाही, या दोन्ही गोष्टी घडल्यामुळे संपूर्ण अधिवेशन वाया गेलं – शरद पवार
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
“हिंडेनबर्ग-अदाणी प्रकरणात संसदीय समितीच्या चौकशीची आवश्यकता नाही, कारण…”, शरद पवारांची मोठी विधानं, वाचा…
हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर गंभीर आरोप झाले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी विधानं केली. त्याचा आढावा…
Web Title: Important statements of sharad pawar on gautam adani hindenburg report rahul gandhi congress pbs