• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. big political claim by congress leader ex cm prithviraj chavan pbs

“सोनिया गांधींनी राष्ट्रवादीला संपवायला महाराष्ट्रात…”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील राजकारणाविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

Updated: July 10, 2023 02:33 IST
Follow Us
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील राजकारणाविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
    1/30

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील राजकारणाविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

  • 2/30

    ते ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलत होते. त्याचा हा आढावा…

  • 3/30

    मी मुख्यमंत्री झालो त्या वेळी शरद पवारांचा गैरसमज होता की सोनिया गांधी यांनी त्यांना संपविण्यासाठी मला दिल्लीतून महाराष्ट्रात पाठविले होते – पृथ्वीराज चव्हाण

  • 4/30

    त्यांचा आजही तसा समज आहे. परंतु तसे काही नव्हते – पृथ्वीराज चव्हाण

  • 5/30

    ‘आदर्श’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मला पाठविले होते – पृथ्वीराज चव्हाण

  • 6/30

    उलट १९९८ मध्ये जे घडले होते, ते, ते विसरले – पृथ्वीराज चव्हाण

  • 7/30

    काँग्रेसने त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद दिले – पृथ्वीराज चव्हाण

  • 8/30

    अर्थात शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष फोडल्याबद्दल माझ्या मनात अजूनही सल आहे – पृथ्वीराज चव्हाण

  • 9/30

    काँग्रेस पक्ष एवढा मोठा पक्ष होता, तो फोडून त्यांना काय मिळाले? आम्ही कमकुवत झालो, तसे तुम्हीही कमकुवत झालात – पृथ्वीराज चव्हाण

  • 10/30

    भ्रष्टाचाराबद्दल आक्रमकपणे बोलणे कर्नाटकमध्ये यशस्वी झाले, महाराष्ट्रातही असेच बोलले गेले पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण

  • 11/30

    आमच्यातील मतभेद कमी करून, पदांचे वाटप करून प्रचार केला पाहिजे. परंतु अजून ते होताना दिसत नाही – पृथ्वीराज चव्हाण

  • 12/30

    गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडाळीमुळे प्रादेशिक पातळीवरील दोन पक्ष कमकुवत झाले – पृथ्वीराज चव्हाण

  • 13/30

    यापुढील काळात महाराष्ट्रात द्विपक्ष पद्धत अस्तित्वात येईल. तशी राजकीय वाटचाल सुरू झाली आहे. म्हणजेच काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होईल – पृथ्वीराज चव्हाण

  • 14/30

    राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशी समाजमाध्यमांमध्ये चर्चा असली तरी तशी शक्यता लगेचच तरी दिसत नाही – पृथ्वीराज चव्हाण

  • 15/30

    शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच, तर त्यांना संसदीय मंडळात सामावून घेतले जाऊ शकते – पृथ्वीराज चव्हाण

  • 16/30

    महाराष्ट्रात आम्ही वज्रमूठ सभा घेतल्या, त्याचा अनुभव मला तरी काही चांगला आला नाही – पृथ्वीराज चव्हाण

  • 17/30

    उद्धवजींची तब्येत बरी नाही, मग ते उशिरा येतील, सगळ्यांनी बाजूच्या पोडियमवर बोलायचे, उद्धवजी आले की त्यांच्यासाठी मध्ये पोडियम ठेवायचा – पृथ्वीराज चव्हाण

  • 18/30

    हे काही बरोबर नव्हते, आम्ही ते बंद करून टाकले. पण पुढे एकत्र सभा होतील, सभा कराव्या लागतील – पृथ्वीराज चव्हाण

  • 19/30

    महाराष्ट्रात सध्या राजकीय आघाडीवर जे घडत आहे, त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक व्हायला पाहिजे, परंतु आमच्यात आपापसात मतभेद आहेत – पृथ्वीराज चव्हाण

  • 20/30

    आधी ही गटबाजी संपुष्टात आणावी लागेल – पृथ्वीराज चव्हाण

  • 21/30

    राहुल गांधी यांनी तरुण नेतृत्व पुढे केले. वरिष्ठ लोकांना बाजूला केले – पृथ्वीराज चव्हाण

  • 22/30

    त्याचे अपेक्षित सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत. कारण जुन्यांचा अनुभव व नव्यांचा उत्साह हे एकत्र करायला पाहिजे होते – पृथ्वीराज चव्हाण

  • 23/30

    पूर्वीच्या नेत्यांनी ते केले, परंतु आता राहुल गांधी यांनी फार आक्रमकपणे तरुणांकडे नेतृत्व दिले. ते यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

  • 24/30

    उदाहरणार्थ भाजपमध्ये पूर्वी काम केलेल्या नवज्योत सिद्धू यांच्याकडे पंजाब काँग्रेसची सूत्रे सोपविली – पृथ्वीराज चव्हाण

  • 25/30

    कॅप्टन अमिरदरसिंग यांच्यासह सारेच जुने नेते एका बाजूला आणि सिद्धू स्वतंत्र असे चित्र निर्माण झाले. अपमान झाल्याने अमिरदरसिंग बाहेर पडले – पृथ्वीराज चव्हाण

  • 26/30

    शेवटी निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसला राज्य गमवावे लागले – पृथ्वीराज चव्हाण

  • 27/30

    केवळ आक्रमकता आहे, म्हणून त्यांची विचारधारा काय आहे हे न बघता पक्षाची सूत्रे दिली – पृथ्वीराज चव्हाण

  • 28/30

    पक्षातून त्याला एखादे मंत्रीपद दिले असते तर हरकत नव्हती. याआधी या चुका झाल्या आणि त्या अजूनही होत आहेत – पृथ्वीराज चव्हाण

  • 29/30

    बसपामधून आलेल्या नेत्याला अचानकच उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष केले गेले. बसपा व काँग्रेसमध्ये काय वैचारिक साम्य आहे? – पृथ्वीराज चव्हाण

  • 30/30

    सर्व छायाचित्र – संग्रहित

TOPICS
पृथ्वीराज चव्हाणPrithviraj Chavanशरद पवारSharad Pawar

Web Title: Big political claim by congress leader ex cm prithviraj chavan pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.