-
सध्या देशामध्ये यूजीसी नेट आणि नीट परीक्षेचा गोंधळ उडालेला आहे. यावरून देशामध्ये विद्यार्थी केंद्र सरकार आणि खासकरून शिक्षण विभागाविरुद्ध निदर्शने करत आहेत.
-
विरोधकांनीही यावरून सरकारला घेरले आहे.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली.
-
या विषयावर बोलताना राहुल यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
-
दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
-
एवढचं नाही तर त्यांनी मोदींना खोचक टोला लगावला.
-
यावेळी ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात. पण काही कारणांमुळे ते भारतातील पेपरफुटी थांबवू शकत नाहीत.”
-
“भाजपाकडून शैक्षणिक क्षेत्र ताब्यात घेतल्यामुळेच पेपरफुटी प्रकरणे घडत आहेत. आतापर्यंत पेपरफुटीची प्रकरणे थांबण्याऐवजी ती वाढतच आहेत. भाजपाने शैक्षणि संस्थांवर आपल्या विचारांचे लोक नियुक्त केले आहेत. पेपरफुटीवर या लोकांकडून कार्यवाही होण्याची गरज होती, मात्र त्यांनी काहीच केले नाही. सुमार लोक शैक्षणिक संस्थांवर नेमल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.”, असेही राहुल म्हणाले.
-
पुढे बोलताना राहू गांधी म्हणाले, “या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. एक परीक्षा रद्द झाली आहे. पुढची परीक्षा होणार की नाही? याची कल्पना नाही. या पेपरफुटीसाठी जे जे लोक जबाबदार आहेत, त्यांना अटक करून कारवाई केली गेली पाहीजे.”
PHOTOS : “भाजपाकडून शैक्षणिक…” नेट परिक्षेतील पेपरफुटीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका; मोदींनाही केले लक्ष्य!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट आणि इतर परिक्षेतील गोंधळावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Web Title: Rahul gandhi criticizes central government over net exam paper leak spl