पुणे : राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात १ हजार ९२९ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के, तर ३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. विशेष म्हणजे, पुणे विभागात सर्वाधिक ३१० महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला असून, १०० टक्के निकालाची सर्वांत कमी ९२ महाविद्यालये लातूर विभागात आहेत.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार
बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १४ हजार ४९६ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. त्यात १६ महाविद्यालयांचा निकाल १ ते १० टक्के लागला. ४३ महाविद्यालयांचा १० ते २० टक्के, ६२ महाविद्यालयांचा २० ते ३० टक्के, १०७ महाविद्यालयांचा ३० ते ४० टक्के, १७८ महाविद्यालयांचा ४० ते ५० टक्के, २८५ महाविद्यालयांचा ५० ते ६० टक्के, ५०४ महाविद्यालयांचा ६० ते ७० टक्के, ९६६ महाविद्यालयांचा ७० ते ८० टक्के, १ हजार ८०६ महाविद्यालयांचा ८० ते ९० टक्के, तर ४ हजार ५६२ महाविद्यालयांचा निकाल ९० ते ९९.९९ टक्के दरम्यान लागला आहे.
पुणे विभागात ६ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, तर ३१० महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. नागपूर विभागात ६ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, २७६ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात सहा महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, १७१ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के, मुंबई विभागात ५ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, तर २४० महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
कोल्हापूर विभागात दोन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, १९८ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के, अमरावती विभागात तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, २८३ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. नाशिक विभागात ४ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, २४७ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के, लातूर विभागात ५ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के, ९२ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. कोकण विभागात एका महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के, तर ११२ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.