पुणे : “२० वर्षे बरोबरीने काम करणाऱ्या पुणे शहरातील ताईंच्या सहकार्‍यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती,” अशी भूमिका कसब्याची उमेदवारी न मिळाल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी मांडली आहे. शैलेश यांनी सदर विधान करत पक्षातील नेत्यांबाबत उघडउघड नाराजी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता आज भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा – पुणे : प्राप्तिकरासाठी नव्या प्रणालीचा नागरिकांना फायदा, जयंत सिन्हा यांचा दावा

हेही वाचा – बारामती मतदारसंघात भाजपची अशीही मतपेरणी

ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष निष्ठा जपली, मात्र…

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुढील निवडणुकीचा काळ साधारणपणे सव्वा वर्षाचा राहिला आहे. तसेच त्यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी कुटुंबीयांना द्यावी, अशी इच्छा पक्षाकडे बोलून दाखवली होती. तसेच, आजवरच्या घटनांमध्ये कुटुंबीयांपैकी एकाला संधी देण्यात आल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. हेच आम्हाला देखील वाटत होते. तसेच ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष निष्ठा जपली, मात्र पक्षाच्या नेतृत्वाने वेगळा विचार केला असून, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shailesh tilak expressed his displeasure for not getting the candidature of kasba svk 88 ssb