‘विक्रमी आणि वेताळ’ हे संपादकीय (११ जानेवारी) तापमानवाढ समस्येकडे नेमकेपणे लक्ष वेधते. होय, पृथ्वी आणि मानवासह समस्त जीवसृष्टीच्या अस्तित्वास धोका निर्माण करणारे देश, सत्ताधीश व धनदांडगे आपल्या संकुचित स्वार्थासाठी सध्याचे विनाशकारी वाढवृद्धीप्रवण विकासप्रारूप अट्टहासाने रेटत आहेत. तेल व वायू कंपन्या तसेच एकूणच जीवाश्म इंधन क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि त्यावर आधारित उद्याोग आणि विकसित देश आपले हितसंबंध जपण्यासाठी सर्व हतखंडे व हरित मखलाश्या (ग्रीनवाशिंग) वापरतात. कमी-अधिक फरकाने विकसनशील राष्ट्रातील सत्ताधीश, धोरणकर्ते आणि उद्याोजकांना हेच सोयीचे असते…मात्र, हा खेळ व खेळी याचे बिंग आता पुरते उघडे पडले आहे. पॅरिस करारात सर्व संमतीने मान्य केलेली १.५ अंश सेल्सियसची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळे आणि जगात दररोज कुठेन् कुठे हवामान अरिष्टाच्या घटना घडत आहेत. कर्ब व अन्य विषारी वायूंचे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी केल्याखेरीज हे टाळता येणार नाही! त्यासाठी महाउत्सर्जनकारी ऊर्जास्राोत, वाहतूक पद्धती, उत्पादन, उपभोग, विनिमय संरचना व सेवासुविधा पुरवठा साखळी यात आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी विकासप्रणाली व जीवनशैलीची परिस्थितिकी व पर्यावरणीय मूल्ये, जीवन दृष्टीशी सांगड जाणीवपूर्वक घालावी लागेल. आता उशीर करणे म्हणजे महाविनाशाला कवटाळणे होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा