मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाली असल्याने उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक १५ ते २० मिनिटाने सुरु आहे. ठाणे ते कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.