लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: मागील काही दिवसांपासून डोंबिवली शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळेत वीज प्रवाह एक ते दीड तास खंडित होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला नसताना विजेचा प्रवाह खंडित होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

महावितरणचे अधिकारी याविषयी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. पाऊस सुरू झाल्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या वीज वाहिनीवर पडतात. कावळे वीज वाहिनीला चिकटतात, अनेक वेळा रोहित्राच्या ठिकाणी कार्बनचा थर तयार होतो. त्या ठिकाणी पावसाचे पाणी पडले की वीज प्रवाह खंडित होतो, असे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत कामगारांकडून चोरी

मागील तीन महिन्यांपासून नागरिक उकाड्याने हैराण आहेत. रात्रीच्या वेळेत वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर घरातील पंखे, वातानुकूलित यंत्र बंद पडतात. रात्रीच्या वेळेत घराबाहेर पडण्याची सोय नसते. दारे खिडक्या उघड्या ठेवल्यावर डास घरात येतात. त्यामुळे उकाडा सहन करत घरात बसून राहावे लागते, असे रहिवाशांनी सांगितले. बुधवारी रात्री डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर भागात दीड तास वीज पुरवठा बंद होता. असाच प्रकार पूर्व भागात सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli the power supply is interrupted in night for one to one and a half hours dvr