एकेकाळी मुंबई कुणाची अशी आरोळी आसमंतात घुमायची आणि एकच जयघोष व्हायचा. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मराठी मतांचं राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी मराठी माणसाकडे दुर्लक्ष केलं, परिणामी मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय. गेल्या आठ वर्षात मुंबईतला मराठी माणसाचा टक्का घसरलाय आणि हिंदी भाषिकांचा वाढलाय. तोही तब्बल दहा पटीने. मुंबई आता मराठी भाषिकांची राहिलीच नाही, असं म्हणण्याची वेळ आली आहे.होय, हे खरंय. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालाय. कारण याच मराठी माणसाच्या मुंबईत मराठी माणसाला जगण्यासाठी संघर्षही करु दिला जात नाहीये. परप्रांतीयांकडून किंवा इतर लोकांकडून मराठी माणसांना त्रास दिल्याच्या अनेक घटना दररोज घडत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परप्रांतीयांची दादागीरी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर बेदाणे विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाला स्थानिक प्रशासनाकडून त्रास देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तर यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शेतमाल विकण्यास केली मनाई

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील प्रशांत पाटील हा तरूण सीएसएमटी येथे बेदाणे विक्री करत होता. यावेळी त्याला स्थानिक प्रशासनाकडून विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्रास देण्यात आला. “इतर लोक बिनधास्त विकत आहेत त्यांना मात्र कोण काही करत नाही पण या मराठी तरुणाला त्रास दिला जातो, मुंबईत मराठी माणसालाच धंदा करू देत नाहीत.” असा आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – दैव बलवत्तर! मृत्यूपासून थोडक्यात बचवला हा युवक; अवघ्या ५ सेंकदात पूल कोसळला, घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबई आणि मराठी भाषा, मुंबई आणि मराठी माणूस या सर्वांवरचं आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पारंपरिक मतदार असलेला मराठी माणूसच मुंबई आणि उपनगरातून हद्दपार होतं असल्याचं उघड झालं आहे. हा व्हिडीओ पाहून “मुंबई आता मराठी भाषिकांची राहिलीच नाही”, अशा प्रकारच्या प्रितिक्रिया देत नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi farmer boy selling farm product in mumbai local administration oppose him video viral on social media srk