वसई : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत ३४७ नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई विरारच्या भागात मागील अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले व कापणीसाठी तयार झालेल्या भात पिकांचे नुकसान झाले होते तर भाजीपाला, फळबागा यांनाही पावसाचा फटका बसला होता. तर दुसरीकडे किनारपट्टीच्या अर्नाळा, किल्लाबंदर, पाचूबंदर या भागात सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेल्याने मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले होते. अवकाळीने नुकसान झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम वसईच्या तहसील विभागाने सुरू केले आहे.

हेही वाचा – वसई : इन्स्टाग्रामवर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची फसवणूक, ५ दिवसांत महिलेने गमावले चक्क १६ लाख रुपये

हेही वाचा – वसई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील छायाचित्रे वायरल, फरार आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक

तलाठी, मंडळ अधिकारी व इतर महसूल कर्मचारी जागेवर जाऊन पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत ३४७ नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर ४५० इतक्या मच्छिमार यांच्या मासळीचे नुकसान झाले आहे त्यांची माहिती घेतली आहे असे वसईचे तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain hits vasai virar area panchnama of 387 affected persons complete ssb