IPL2023, CSKvsRR: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३च्या ७१व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध तीन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानच्या विजयात आर. अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. अश्विनने प्रथम फलंदाजी करत ३० धावा केल्या, त्यानंतर चेंडूवर दोन बळी घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई-राजस्थान सामन्यादरम्यान आर. अश्विन आणखी एका कारणाने चर्चेत होता. वास्तविक या सामन्यादरम्यान खूप दव पडले होते, त्यामुळे दुसऱ्या डावात पंचांनीच हस्तक्षेप करून चेंडू बदलला. यामुळे राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने यावर आपली स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. त्याला याचा आनंद झाला नाही उलट त्याने अंपायर्सच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. अंपायर्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अश्विनला आता महागात पडले आहे.

बीसीसीआयने केली मोठी कारवाई

बीसीसीआयने कारवाई करत रविचंद्रन अश्विनला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावला आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, “राजस्थान रॉयल्स’ रविचंद्रन अश्विनला चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील टाटा आयपीएल सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. अश्विनने आचारसंहितेच्या कलम २.७ अंतर्गत लेव्हल-१ चा गुन्हा स्वीकारला आहे. सामनाधिकारीचा निर्णय अंतिम असतो आणि आचारसंहितेच्या लेव्हल-१ भंगासाठी ही शिक्षा बंधनकारक असते.

हेही वाचा: Simon Doull on Pakistan: “पाकिस्तानात राहणे म्हणजे तुरुंगात राहण्यासारखे…’ न्यूझीलंडच्या पाक दौऱ्याआधी सायमन डूलचा धक्कादायक खुलासा

काय म्हणाला होता आर. अश्विन?

आर. अश्विनने सामन्यानंतर सांगितले की, “खूप दव असताना अंपायर्सनी चेंडू बदलल्याचे मी यापूर्वी पाहिले नव्हते. दव पडल्याने अंपायर्सनी स्वत:हून चेंडू बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते आणि मला आश्चर्य वाटले. खरे सांगायचे तर आयपीएलमध्ये यावेळी मैदानावर घेतलेल्या काही निर्णयांचे मला थोडे आश्चर्य वाटते. मला असे म्हणायचे आहे की मला आश्चर्य वाटते कारण त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणूनच मला विश्वास आहे की तुम्हाला समतोल राखण्याची गरज आहे.”

अश्विन पुढे म्हणाला, “आमचा संघ गोलंदाजी करत होता आणि आम्ही चेंडू बदलण्यास सांगितले नाही. पण अंपायर्सनी स्वत:च्या इच्छेनुसार चेंडू बदलला. मी अंपायरला विचारले आणि तो म्हणाला की आम्ही ते करू शकतो. म्हणून मला आशा आहे की जेव्हाही दव असेल तेव्हा ते ते बदलू शकतील. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता, परंतु तुम्हाला एक मानक निश्चित करणे आवश्यक आहे.”

हेही वाचा: IPL2023, CSKvsRR: “असं कधीच आधी…”, अंपायर्सच्या निर्णयावर अ‍ॅश अण्णाची नाराजी, IPL कॉन्सिलकडे केली ‘ही’ मागणी

अश्विन पुढे म्हणाला, “मी ज्याप्रकारे गोलंदाजी करत आहे त्याचा मी पुरेपूर आनंद घेत आहे आणि मी याबद्दल जास्त विचार करत नाही. सामन्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गोलंदाजी करणार्‍या माझ्यासारख्या खेळाडूने वेगवेगळ्या गोलंदाजीत विविधता आणत, वेगवेगळ्या गतीने आणि योग्य दिशेने गोलंदाजी करण्याची तयारी ठेवावी.” या विजयामुळे अश्विनचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर चेन्नई पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 r ashwin won the match but after that the pocket was cut what happened in chennai bcci took this big action avw