आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंगळवारी (२७ जून) मुंबईतील एका कार्यक्रमात त्याने हा खुलासा झाला. यावेळी श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन उपस्थित होता. सेहवागने भारतीय संघासाठी तीन विश्वचषक खेळले आहेत. २००३ मध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता आणि २००७ मध्ये ती पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती. त्यानंतर २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमादरम्यान सेहवागने २०११च्या विश्वचषकातील त्याच्या आठवणी शेअर केल्या. प्रत्येक सामन्यात चौकार मारून सुरुवात करायची होती असे त्याने सांगितले. त्याचवेळी टीम इंडियाला तेव्हा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला वर्ल्डकप जिंकायचा होता. याशिवाय त्याने तत्कालीन कर्णधार धोनीबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली. सेहवाग म्हणाला की, प्रत्येक खेळाडूची स्वतःची सुपरस्टीशन असतात. सचिन नेहमी फलंदाजीला जाण्याआधी गाणे ऐकायचा. मी फलंदाजी करताना गाणे म्हणायचो खिशात लाल रुमाल ठेवायचो. तसेच धोनीनेही त्यावेळी असेच काहीसे केले होते तो काही वेगळा नव्हता.”

हेही वाचा: ICC WC 2023: वर्ल्डकप २०२३चे वेळापत्रक जाहीर होताच सेहवागने केली भविष्यवाणी, म्हणाला, “हे ‘चार’ संघ पोहोचतील फायनलला…”

धोनीविषयी काय म्हणाला सेहवाग?

सेहवागने सांगितले की, “धोनीने संपूर्ण विश्वचषकामध्ये फक्त खिचडी खाल्ली होती. या स्पर्धेतील बहुतांश सामन्यांमध्ये धोनी चांगला फॉर्ममध्ये नसल्याचा खुलासा त्याने केला. मात्र, भारत सामने जिंकत असताना ‘खिचडी’ खाण्याची चाल त्याने सुरूच ठेवली. धोनीने संपूर्ण स्पर्धेत एकही मोठी खेळी खेळली नाही, मात्र अंतिम फेरीत त्याने नाबाद ९१ धावा करत संघाला चॅम्पियन बनवले.”

सेहवाग पुढे म्हणाला, “प्रत्येकाकडे काही ना काही युक्ती होती आणि प्रत्येकजण आपली ती गोष्ट फॉलो करत होता. महेंद्रसिंग धोनीने संपूर्ण विश्वचषकादरम्यान खिचडी खाण्याची युक्ती सुरू ठेवली होती. तो म्हणायचा की मी धावा करत नसलो तरी ही युक्ती काम करत आहे आणि आम्ही सामना जिंकत आहोत. काहीजण याला अंधश्रद्धा म्हणतील पण प्रत्येकाचा एक विश्वास असतो.”

हेही वाचा: Ruturaj Gaikawad: वेंगसरकर यांनी गायकवाडच्या निवडीबाबत जाफरला सुनावले; म्हणाले,” प्रत्येक खेळाडू स्पर्धेत असतो म्हणजे काय?”

१५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामना

विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन आणि अंतिम सामने खेळवले जातील. इतर नऊ ठिकाणे बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे आहेत. सराव सामन्यांच्या यजमानपदाचा मान हैदराबादसह गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमला मिळाला आहे. ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत-पाकिस्तान मेगा मॅच १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2011 ms dhoni had to eat khichdi to win the world cup sehwag revealed avw