Mumbai Maharashtra Monsoon Update : मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी आहे. मागील २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी कोसळधारांमुळे तर काही भागांमध्ये बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, बारामती व कर्जत शहरांमधल्या रस्त्यांवर पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडथळे येत आहेत. दरम्यान, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस सुरू राहिल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. एवढंच नाही तर पावसामुळे मुंबईचा वेगही मंदावला आहे. लाइफ लाइन समजली जाणारी लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Mumbai Maharashtra News Live Today | मुंबईसह राज्यभरात कोसळधारा! पावसामुळे मंदावला लोकल वाहतुकीचा वेग यासह महत्वाच्या घडामोडी
Melghat Monsoon Rain : मे महिन्यात धुक्याची दरी… निसर्गाची किमया न्यारी
झाडे आणि वेलींवर चमकणारे पावसाचे थेंब, दाट धुक्याची चादर यामुळे जणू काही ढग जमिनीवर उतरल्याचा भास होतो आहे.
Navi Mumbai Rain Updates : नवी मुंबईत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस !
आज संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Badlapur Rain Latest Updates : मुसळधार पावसाने बदलापूरला झोडपले, अवघ्या चार तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद
यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाल्याने पूर्व मोसमी पावसानेही लवकर हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण मे महिना कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे.
Mumbai Rain News : मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, पावसाचा रेड अलर्ट
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Red Alert in Mumbai Raigad : मुंबई-रायगडला रेड अलर्ट! कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, लोकल सेवेचा खोळंबा
Heavy Rain Alert for Maharashtra : मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४ तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत पावसाचा रेड अलर्ट (Express Photo)
मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी आहे. मागील २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी कोसळधारांमुळे तर काही भागांमध्ये बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, बारामती व कर्जत शहरांमधल्या रस्त्यांवर पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडथळे येत आहेत.