Maharashtra Political New Updates, 11November 2025 : दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान काहीही झालं तरीही मनसेसह जायचं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महापालिका आणि इतर निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. या बातमीसह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : दिल्लीत झालेला कारचा स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश, नाना पटोलेंची टीका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी
मुंबई महानगरपालिकेच्या शाळासंख्येत घट… अन्य माध्यमाच्या शाळा घसरणीला; इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मात्र वाढ
मुंबई : विविध कारणांमुळे महानगरपालिकेच्या शाळा बंद पडण्याचे सत्र सुरूच असून न्यू माहीम शाळेच्या मुद्द्यामुळे बंद शाळांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईत गेल्या तीन वर्षात विविध माध्यमांच्या २८ शाळा बंद किंवा समायोजित झाल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतला स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश-नाना पटोले
आम्हीच करू शकतो अशा पद्धतीने आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवलं. आता कश्मीर असुरक्षित आहे, छप्पन इंचाची छाती आता कुठे गेली आहे? आम्हाला राजकारण करायचं नाही. दिल्लीत आणि केंद्रात सरकार यांच असताना हे दहशतवादी या ठिकाणी आले कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे.नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोटे आश्वासनांची पोलखोल आता झाली आहेभ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्हाला यात राजकारण करायचं नाही पण देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात आम्ही तिथेच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या बॉम्बस्फोटामध्ये दहशतवादी येतात, सरकार बिहारच्या प्रचारात मग्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे. देश सुरक्षित नाही, देशाच्या सुरक्षेची हमी घेणारे प्रधानमंत्री, गृहमंत्री कुठे लपले आहेत? या स्फोटाची जबाबदारी त्यांची आहे अशी टीकाही नाना पटोलेंनी केली आहे.
दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.
