Maharashtra Politics Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चर्चेत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावरून राज्यभरात आवाज उठवला आहे. भाजपाचे आमदा सुरेश धसही या प्रकरणी आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप होत विरोधक करत आहेत. तसेच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, यावरूनच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत असून यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. यातच आज मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी असल्याची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांनी आपल उपोषण मागे घेतलं आहे. तसेच ठाकरे गटाचे काही नेते आणि कॉग्रेसचे काही नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Live Update Today : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी : महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री
महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे का? यावर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं की, “आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत”, असं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
'भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी', नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका (फोटो-संग्रहित छायाचित्र)