आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. आपला देश जगातला सर्वात मोठी आर्थिक शक्ती असलेला देश झाला पाहिजे. भारत देशात सामर्थ्यशाली होण्याची ताकद आहे पण काही चुकीच्या धोरणांमुळे आणि स्वातंत्र्यानंतर राबवण्यात आलेल्या चुकीच्या धोरणांमुळे धनवान देश पण जनता गरीब राहिली असं चित्र आहे. चुकीची आर्थिक धोरणं, भ्रष्टाचारी सरकार आणि भविष्यातली दृष्टी नसलेले अधिकारी असल्याने देशाचं नुकसान झालं. मात्र आता देश बदलतो आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करायचं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे की भारत हा आत्मनिर्भर झाला पाहिजे. जर ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर Imort कमी केला पाहिजे आणि Export वाढवला पाहिजे. मी कोल्हापूरमध्ये आलो तेव्हा विचारलं की इथे ट्रॅक्टर्सचे पार्ट मिळतात, पण मग इथे ट्रॅक्टर का बनवत नाही? यासाठी लवकरच विचार झाला पाहिजे. आपण काही दिवसांपूर्वीच ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जपानला मागे टाकलं आहे. इलेक्ट्रिक ट्रक, लिथियम आर्यन बॅटरी, सोडियम आर्यन बॅटरी, फ्लेक्स इंजिन हे आणून आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याकडे ४०० तरूणांनी ई स्कूटर तयार केल्या आहेत. मी सगळ्यांना संमती दिली आहे. मी माझ्याकडे ई रिक्षा वापरतो. त्याचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत काहीही नाही असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली येत्या काळात ऑटोमोबाईल हब झालं पाहिजे यासाठी आम्ही विचार करतो आहोत असंही नितीन गडकरींनी जाहीर केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The people of our country remained poor due to the wrong policies implemented after independence said nitin gadkari in kolhapur scj
First published on: 28-01-2023 at 19:38 IST