मराठी अभिनेता भरत जाधवने अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने मुंबई सोडली आणि तो कुटुंबाबरोबर कोल्हापुरात राहत आहे. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या भरतने काही महिन्यांपूर्वी कुटुंबासह मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या या टप्प्यावर त्याने असा निर्णय का घेतला? आणि आपल्या राहण्यासाठी त्याने कोल्हापूर शहर का निवडले? याबद्दल त्याने अलीकडेच खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चन यांचा फोन आल्यावर अशी होती नितीन गडकरींची प्रतिक्रिया; किस्सा सांगत म्हणाले, “बिग बींनी मला…”

मुंबई सोडून कोल्हापुरला जाण्याबाबत भरत म्हणाला, “मुंबई शहर बिझनेस हब झालंय, असं मला वाटतंय. मी असा विचार करत आहे कारण मला आता सगळ्या गोष्टींपासून सुटका हवी आहे. आता माझ्याकडे कोल्हापुरात एक घर आहे आणि माझे आई-वडीलही माझ्यासोबत राहतात. काम असेल तेव्हा मी इथे मुंबईला येतो. मी माझा मुंबईचा फ्लॅट विकला नाही. शूटिंग किंवा काम असेल तेव्हा मी इथे येतो आणि परत कोल्हापूरला जातो.”

“बाळासाहेबांचं ते स्वप्न अपूर्णच”, नितीन गडकरींचा खुलासा; म्हणाले, “त्यांच्या निधनाआधी मी रुग्णालयात भेटल्यावर…”

या निर्णयाबद्दल पुढे भरत म्हणाला, “आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं थांबणं, वेळ घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मला तिथे छान वाटतं, तिथे ताजी हवा आहे. मला मुंबई खूप आवडते. पण तिथून काम करणं गरजेचं राहिलेलं नाही. आता मी कोल्हापूरहून मुंबईला काम करण्यासाठी येतो, माझं काम झालं की कोल्हापूरला परत जातो.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jadhav statement on leaving mumbai and settling in kolhapur with family hrc