नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी  स्मार्ट प्रिपेड मीटर  लावण्याचे काम महावितरणने सुरु केले होते. परंतु नागरीकांचा विरोध लक्षात घेता तत्कालीन उर्जा मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट प्रिपेड मीटर लावणार नसल्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता निवडणुका झाल्यानंतर परत स्मार्ट प्रि पेड मीटर लावण्याचे काम महावितरण कंपनीकडून करण्यात येत आहे. यामुळे स्मार्ट प्रिपेड मिटरची सक्ती न करता विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

 मागील वर्षी राज्यात सर्वत्र स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याची घोषणा केली होती.  नागरीकांचा या स्मार्ट प्रिपेड मिटरला विरोध असलयाने  मुंबई सह राज्याभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले होते. यानंतर तत्कालीन उर्जा मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विधानसभेत आश्वासन दिले होते की स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्यात येणार नाही. तसेच २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतल प्रचारात जाहीर सभेतही त्यांनी तसे आश्वासन दिले होते. परंतु सध्या राज्यभरात विरोधत असतांना हे स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. या स्मार्ट प्रिपेड मिटरला विरोध असल्याने ते लावण्यात येवून नये असे अनिल देशमुख म्हणाले.

महावितरणचा नुकताच वर्धापण दिन मुंबई येथे साजरा झाला. या कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मार्च २०२६ पर्यत राज्यात सर्वत्र स्मार्ट प्रि पेड मिटर लावण्याचे टार्गेट पुर्ण करणार असल्याचे वक्तव्य केले. तसेच राज्यात यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात सांगीतले. काही कार्पोरेट कंपन्याया फायदा होण्यासाठी नागरीकांनीच्या माथी हे स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येत आहे.  त्यांनी मोठया प्रमाणात हे स्मार्ट प्रिपेड मिटर तयार केले आहे. त्यांचे नुकसान होवून नये म्हणुन विधानसभेत सोबत विधानसभा निवडणुकीत आश्वासन देवूनही या स्मार्ट प्रिपेड मिटर सक्ती नागरीकांना करण्यात असे असल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.