नागपूर : एकीकडे वंदे भारत एक्सप्रेससारख्या वातानुकूलित रेल्वेगाडीतून अत्याधुनिक सुविधा मिळायला सुरुवात झाली, तर दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे ‘कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांना त्यांच्या आरक्षित जागेवर बसण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वदेश निगम यांचे कुटुंब १२५२२ एर्नाकुलम-बरौनी एक्सप्रेसने नागपूरहून लखनऊला निघाले होते. ही गाडी नागपुरात आली आणि निगम कुटुंबीय एस-४ मध्ये बसण्यासाठी गेले. परंतु, त्या रेल्वेडब्यात इतकी गर्दी होती की, त्यांना डब्यात चढण्यासाठी कसरत करावी लागली. त्यांच्या आरक्षित जागेवर इतर लोक बसलेले होते आणि ते तेथून उठण्यास तयार नव्हते. निगम कुटुंबीयांनी तिकीट तपासणीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही त्या डब्यात आले नाही. त्यानंतर निगम कुटुंबीयांना मिळेल तेथे बसून प्रवास करावा लागला. अशाप्रकारे ‘कन्फर्म’ तिकीट असूनही प्रवाशांना यातना सहन कराव्या लागत आहे. विशेष म्हणजे याची कोणीही दखल घेत नाही. यासंदर्भात भारतीय यात्री केंद्राने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्रासाठी तारखेच्या अटीमुळे कोंडी; करोना काळातील जाहिरात असल्याने काही उमेदवार अपात्र

हेही वाचा – ‘समृद्धी’वर भीषण अपघातात;दोन मुलांसह सहा मृत्युमुखी; भर वेगातील मोटार कठडय़ावर आदळली

निगम कुटुंबीयांचे एस-४ मध्ये सहा बर्थ कन्फर्म होते. परंतु, त्यांना बसण्यास जागा मिळाली नाही. गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छतागृहात जाण्यास अडथळा निर्माण होत होता. ‘टीटीई’ या रेल्वेत आले नाही. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनीदेखील ढुंकून पाहिले नाही, असे भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway ticket confirm but not got seat in railway to passenger boarded from nagpur rbt 74 ssb