-
काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या नांदेडमधून मार्गक्रमण करत आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.
-
या यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधींना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
-
नांदेडमधील नवा मोंढा येथे राहुल गांधींची सभा पार पडली. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.
-
“काळापैसा आम्ही संपवू असा बहाणा भाजपानं बनवला आणि भारतीय रोजगाराचा कणा तोडला. नोटाबंदीनंतर काळापैसा गायब झाला का? उलट काळा पैसा वाढला”, असे गांधी नवा मोंढा येथील सभेत म्हणाले.
-
“भारताची संपूर्ण संपत्ती दोन-तीन उद्योगपतींच्या हाती जात आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही”, अशी सर्वसामान्यांची व्यथा राहुल गांधींनी यावेळी मांडली.
-
“महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गायब होत आहेत. त्याचप्रमाणे १५ लाखही गायब झाले”, अशी टीका राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
-
भीती आणि द्वेषाच्याविरोधात आम्ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
-
“नोटाबंदी आणि जीएसटीने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे व्यापारी, शेतकरी, छोटे आणि मध्यम उद्योग नष्ट केले आहेत”, असा आरोप गांधी यांनी केला.
-
या यात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.
-
या यात्रेचा विदर्भातील प्रवास १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार आहे. ही यात्रा वाशीम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे.
-
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात सोमवारी प्रवेश केला.
-
(फोटो सौजन्य- खासदार सुप्रिया सुळे यांच्या ट्विटरवरुन)
PHOTOS: “नोटाबंदीनंतर काळा पैसा गायब झाला का?” ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींचा सवाल, यात्रेत सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे नेते सहभागी
भीती आणि द्वेषाच्याविरोधात आम्ही ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Web Title: Ncp leader supriya sule participated in bharat jodo yatra at nanded led by rahul gandhi rvs