-
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचा दारूण पराभव केला.
-
या विजयाने भाजपाला धक्का बसला, तर विरोधकांचा उत्साह वाढला.
-
या विजयानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली.
-
या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धंगेकरांच्या विजयाची खात्री का नव्हती? भाजपाचा पराभव का? अशा अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचा हा आढावा…
-
कसबा निवडणुकीतील यशाचं सूत्रं काय हे खरंतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे – शरद पवार
-
धंगेकरांना यश मिळेल, असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती – शरद पवार
-
धंगेकरांच्या विजयाची खात्री नसण्याचं मुख्य कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ – शरद पवार
-
याच्या खोलात जायची गरज नाही. परंतु हा भाजपाचा गड आहे, असं अनेक वर्षे बोललं जातं – शरद पवार
-
दुसरी गोष्ट तिथं अनेक वर्षे गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं – शरद पवार
-
बापट सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे नेते आहेत – शरद पवार
-
गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजपा आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते – शरद पवार
-
मात्र, पुण्यातील भाजपा सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते – शरद पवार
-
त्यामुळे साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल, असं आम्हाला वाटत होतं – शरद पवार
-
शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याबाबत कुजबुज ऐकायला मिळाली – शरद पवार
-
याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे परिणाम होतील, अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होती – शरद पवार
-
मात्र, निवडणूक झाल्यावर जी माहिती मिळाली ती म्हणजे ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षोनुवर्षे कशाचीही अपेक्षा न करता लोकांमध्ये काम करणारी होती – शरद पवार
-
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा असा उमेदवार आहे जो कधीच चारचाकी गाडीत बसत नाही. हा दोनचाकी गाडीवर फिरतो – शरद पवार
-
त्यामुळे दोन पाय असणाऱ्या सर्व मतदारांचं लक्ष या उमेदवाराकडे आहे. त्याचा फायदा होईल, असं ऐकायला मिळालं. ते १०० टक्के खरं ठरलं – शरद पवार
-
आगामी निवडणुकीत महाविकासआघाडी म्हणून लढण्याबाबतची चर्चा माझ्याशी कुणी केलेली नाही. त्या चर्चेत मी नाही – शरद पवार
-
या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीने दुसरे सहकारी आहेत. ते बसून निर्णय घेतील – शरद पवार
-
उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मविआच्या लोकांना एकत्र ठेवणं आणि एकत्र निर्णय घेणं आणि एकत्र निवडणुकांना सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल – शरद पवार
-
सध्या लोकांना बदल हवाय हे मी बघतोय – शरद पवार
-
मविआच्या सगळ्या नेत्यांशी आम्ही बोलणार आहे – शरद पवार
-
बहुसंख्य लोकांनी मला सांगितलं की मविआचा उमेदवार, त्यांनी केलेल्या कामाची नोंद त्यांनी घेतली आहे – शरद पवार
-
कसबा पोटनिवडणुकीत मिळवलेला विजय हा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा नसून रवींद्र धंगेकरांचा आहे हे भाजपाचं आकलन असेल – शरद पवार
-
चांगली गोष्ट आहे. किमान त्यांनी ज्यांचा विजय झाला, असे विजय देणारे उमेदवार आमच्या सगळ्यांचे होते हे मान्य केलं – शरद पवार
-
कारण निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्यं काय काय होती, हे भाषणात आलं आहे – शरद पवार
-
आता त्यात थोडासा गुणात्मक बदल आहे. किमान निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगलं बोलतायत. चांगली गोष्ट आहे – शरद पवार (सर्व छायाचित्र – संग्रहित)
“शेवटी शेवटी कुजबुज ऐकायला मिळाली की, गिरीश बापट…”, शरद पवारांची महत्त्वाची विधानं…
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धंगेकरांच्या विजयाची खात्री का नव्हती? भाजपाचा पराभव का? अशा अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचा हा आढावा…
Web Title: Important statements of sharad pawar over ravindra dhangekar kasba election pune pbs