-
ज्या निष्ठावंत सैनिकांनी गेली अनेक वर्षे पक्षासाठी रक्त सांडले, त्यांना नाराज करायचे नाही म्हणून आतापर्यंत मनसेशी युती केली नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात भाजपबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण ते आपल्या नीतिमत्तेत बसणारे नाही.”
-
“मी मुख्यमंत्री असताना फुटलेल्या सर्व आमदारांना एका खोलीत डांबून ठेवू शकलो असतो, पण ते अगोदरच मनाने फुटले होते. त्यांना खोलीत डांबून ठेवण्यात काय अर्थ होता,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
“जुने निष्ठावंत जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा खूप वाईट वाटते,” अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
-
“तुमच्यापैकी कोणाला आजही पक्ष सोडून जावेसे वाटत असेल तर खुशाल जा,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.
-
“मंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांना धूळ चारण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे,” अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत दिल्या.
“…म्हणून आतापर्यंत मनसेशी युती केली नाही”, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
“राज्यात भाजपबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
Web Title: Uddhav thackeray on raj thackeray mns alliance and patch up bjp ssa