Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. from sourav ganguly to ms dhoni and rohit these indian captains lose most home test matches spl

सौरव गांगुली ते महेंद्रसिंग धोनीपर्यंत ‘या’ दिग्गजांच्या नेतृत्वात भारताला मायभूमीवर सर्वाधिक पराभवांचा सामना करावा लागला

नुकताच भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत घरच्याच पीचवर मात खावी लागली आहे. दरम्यान भारताच्या कोणत्या टेस्ट क्रिकेट कर्णधारांना मायदेशातील कसोटी मालिकांमध्ये सर्वाधिक पराभवाचा सामना करावा लागला आहे ते जाणून घेऊयात.

Updated: November 4, 2024 13:07 IST
Follow Us
    Indian captains to lose most home Test matches
    विराट कोहली
    विराट कोहलीने २०१४ च्या शेवटी कसोटी कर्णधारपद स्वीकारलं आणि ३१ घरच्या कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्याच्या कार्यकाळात, भारताने २४ सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला, तर एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दुसरा इंग्लंडविरुद्ध असे २ पराभव झाले. (AP Photo/Halden Krog)
    सचिन तेंडुलकर
    सचिनच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या भूमीवर १२ कसोटी सामने खेळले. यापैकी केवळ ४ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला, तर इतर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, उर्वरित ५ सामने अनिर्णित राहिले. (Express Photo)
    सौरव गांगुली
    कर्णधारपदाच्या कार्यकाळात सौरव गांगुलीने मायदेशातील २१ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १० कसोटींमध्ये विजय मिळवला, ३ पराभवांना सामोरे जावे लागले आणि ८ सामने अनिर्णित राहिले. (Source: PTI)
    महेंद्र सिंग धोनी
    एमएस धोनी हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कुशल कर्णधार म्हणून ओळखला जातो. २००७ टी२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीन प्रतिष्ठित ICC व्हाईट-बॉल टूर्नामेंटमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.
    धोनीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने घरच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. त्याच्या नेतृत्वाखाली ३१ घरच्या कसोटी सामन्यांपैकी, भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला, यामध्ये तीन पराभव आणि सहा अनिर्णित सामने राहिले. दरम्यान, धोनीच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये एक उल्लेखनीय पराभव म्हणजे २०१२ मधील इंग्लंडविरुद्ध खेळलेली मालिकेचा पराभव. (Photo Source: Reuters)
    बिशन सिंग बेदी
    महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी मायदेशात केवळ ८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला ३ पराभवांचा सामना करावा लागला आणि ३ सामन्यांत विजय मिळवला. उर्वरित दोन कसोटी अनिर्णित राहिल्या. (Photo: Getty Images)
    कपिल देव
    १९८३ चे विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांचा मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात खेळल्या गेलेल्या २० सामन्यांपैकी संघाला फक्त दोनच सामने जिंकता आले आणि ४ पराभवांना सामोरे जावे लागले. उर्वरित १३ सामने अनिर्णित राहिले, एका सामन्याचा निकाल बरोबरीत लागला. (Express Photo)
    मोहम्मद अझरुद्दीन
    माजी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारताचा कसोटी कर्णधार म्हणून एक प्रभावी विक्रम नोंदवला आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताने विशेषत: घरच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. अझरुद्दीन यांनी घरच्या भूमीवर २० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यात १२ विजय, तीन अनिर्णित आणि चार पराभव समाविष्ट आहेत. (Express Photo)
    रोहित शर्मा
    कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्मालाही पराभवाचा सामना करावा लागला. विशेषत: न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर भारताच्या नुकत्याच झालेल्या मालिका पराभव झाला आहे. हा त्याचा १२ वर्षांतील पहिला पराभव ठरला आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात घरच्या भूमीवर १६ कसोटी सामन्यांमध्ये भारताला पाच पराभव पत्करावे लागले, १० विजय मिळवले आणि एक सामना अनिर्णित राहिला. (Photo : (Sportzpics))
    मन्सूर अली खान पतौडी
    दिवंगत भारतीय क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्या नावावर मायदेशात भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने गमावण्याचा विक्रम आहे. पतौडी यांनी २७ घरच्या कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, यामध्ये संघाने ६ सामने जिंकले, तर नऊ पराभवांना सामोरे जावे लागले आणि १२ कसोटी अनिर्णित राहिल्या. (Source: AP Photo)
TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketक्रिकेटCricketक्रीडाSportsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoni

Web Title: From sourav ganguly to ms dhoni and rohit these indian captains lose most home test matches spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.