India-pakistan Ceasefire Updates: ७ मे पासून सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर आज अखेर थांबविण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी सामंजस्य करार केला असून आज सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रविराम करण्यास सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी याची माहिती दिली. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट टाकून भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचा दावा केला. भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामासाठी तयार झाल्याची घोषणाही त्यांनी केली. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आजवर कोणतीही तडजोड न करता ठाम अशी भूमिका घेतलेली आहे आणि पुढेही घेत राहिल.”
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले की, पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ शस्त्रविरामावर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.
Special Briefing by Ministry of Defence on Operation Sindoor: संरक्षण मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत झालेल्या लष्करी संघर्षाची माहिती देण्यात आली.
शस्त्रविराम झाला असला तरी पाकिस्तानने यापुढे काही आगळीक झाल्यास त्याला भारतीय सैन्यदलाकडून सडेतोड उत्तर देण्यात येईल, असेही संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
India-Pakistan Ceasefire Live Updates in Marathi | भारत पाकिस्तान लाईव्ह अपडेट्स | ऑपरेशन सिंदूर लाईव्ह अपडेट्स
Mumbai On High Alert: मुंबईभोवती सुरक्षा वाढवली; समुद्रात नौदलाचे ताफे तैनात
पाकिस्तानचे आठ तळ लक्ष्य, सकाळच्या धडक कारवाईमुळे पाकिस्तान गुडघ्यावर?
पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक हल्ल्यास जशास तसे प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानातील तब्बल आठ लष्करी ठिकाणे शनिवारी लक्ष्य केली. यामध्ये पाकिस्तानी लष्कर तसेच हवाई दलाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती असून त्यामुळेच अखेर तेथील सरकार आणि सैन्याला शस्त्रसंधीसाठी प्रस्ताव द्यावा लागल्याची चर्चा आहे.
“शस्त्रविराम होवो किंवा न होवो आपण, आपण पहलगाम…”, असदुद्दीन ओवेसींची पोस्ट चर्चेत; सरकारपुढे मांडले महत्त्वाचे प्रश्न
असदुद्दीन ओवेसी यांनी यांनी यासंबंधी सोशल मीडीय प्लॅटफॉर्म एक्सवर भली मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतीय लष्कराला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच पाकिस्तानी हल्ल्यात मृत्यू तसेच जखमी झालेल्यांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. याबरोबरच त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीबद्दल प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
श्रीनगर स्फोटांनी हादरले
जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगर शनिवारी पहाटेच्या सुमारास स्फोटांच्या आवाजांनी हादरली. या घटनेनंतर शहरात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून अनेक ठिकाणी केलेले ड्रोन हल्ले उधळून लावल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली.
वाचा सविस्तर
बीएसएफ अधिकारी मोहम्मद इम्तियाज शहीद
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम जाहीर झाल्यानंतर काही तासांतच जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू झाल्याचे वृत्त येत आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी या घटनेवर भाष्य केले नाही. परंतु पोलिसांनी रात्री ८:३० च्या सुमारास गोळीबार सुरू झाल्याची पुष्टी केली. दहा मिनिटांतच, उधमपूरमध्ये सायरन वाजू लागले, त्यानंतर संपूर्ण बंदूक झाली तर रहिवाशांनी सांगितले की त्यांना मोठे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी गोळीबारात बीएसएफ अधिकारी मोहम्मद इम्तियाज शहीद झाले आहेत.
शस्त्रविरामानंतर पाकिस्तानने आपलं हवाई क्षेत्र सुरु केलं, पण भारतीय विमानांना परवानगी नाही
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अखेर आज (१० मे) संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाबाबत एकमत झालं. शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र उघडले आहे. मात्र, भारतीय विमानांना अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाणे करण्यास नकार परवानगी दिलेली नाही. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
Ajit Doval : अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चर्चा; म्हणाले, “युद्ध ही…”
नागरोटा मिलिटरी स्टेशनवर संशयास्पद हालचाली,शोध मोहीम सुरू
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अखेर आज (१० मे) संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाबाबत एकमत झालं. आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकमत झालं आणि त्यानंतर शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. शस्त्रविरामानंतर काही तासांतच पाकिस्तानची आगळीक पुन्हा समोर आली. यानंतर आता नाग्रोटा मिलिटरी स्टेशनच्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने सांगितले की जम्मूच्या नागरोटा येथे शोध मोहीम सुरू आहे. नाग्रोटा मिलिटरी स्टेशनच्या परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर सतर्क सेन्ट्रीने आव्हान दिले, ज्यामुळे संशयिताशी थोडक्यात गोळीबार झाला. घुसखोरांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.
On noticing suspicious movement near the perimeter, alert sentry at #nagrota Military Station issued a challenge, leading to a brief exchange of fire with the suspect.
— White Knight Corps (@Whiteknight_IA) May 10, 2025
Sentry sustained a minor injury.
Search operations are underway to track the intruder(s)@adgpi…
India Pakistan Tension : शस्त्रविरामानंतर पाकिस्तानची पुन्हा आगळीक, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी दिला इशारा; म्हणाले, “परिस्थितीचं गांभीर्य…”
India Pak news: शस्त्रविराम उल्लंघानंतर परराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषद, म्हणाले…
शस्त्रविराम केल्यानंरत काही तासांतच पाकिस्तानकडून त्यांचे उल्लंघन करण्यात येत आहे. यावर थोड्यावेळापूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. पाकिस्तानने अधिक जबाबदारीने वागून योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन मिस्री यांनी केले.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "The Armed Forces are maintaining a strong vigil on the situation and have been given instructions to deal strongly with any instances of repetition of the violations of the borders along the international border as well as the… pic.twitter.com/35qhh0AFWU
— ANI (@ANI) May 10, 2025
“पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन…”, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची पत्रकार परिषदेत माहिती
शस्त्रविराम करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर पुढच्या काही तासांतच पाकिस्तानची पुन्हा आगळीक समोर आली आहे. शस्त्रविरामानंतर काही तासांतच अनेक ठिकाणी ड्रोन दिसून आले होते. दरम्यान, यानंतर भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानला भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमधील सामंजस्य कराराची आठवण करून दिली. तसेच गेल्या काही तासांत भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमधील सामंजस्य कराराचे उल्लंघनाचे होत असल्याचं दिसून येत असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटल आहे.
#watch | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "The Armed Forces are maintaining a strong vigil on the situation and have been given instructions to deal strongly with any instances of repetition of the violations of the borders along the international border as well as the… pic.twitter.com/35qhh0AFWU
— ANI (@ANI) May 10, 2025
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर (ट्विट) एक पोस्ट शेअर केली आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या पोस्टमध्ये व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यांनी म्हटलं की, “युद्धबंदीचं काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले”, असं त्यांनी म्हटलं आहे.
This is no ceasefire. The air defence units in the middle of Srinagar just opened up. pic.twitter.com/HjRh2V3iNW
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
India Pak news: पंजाबच्या अनेक शहरांमध्ये ब्लॅकआऊट
पंजाबच्या फिरोजपूर, बर्नाला, पठाणकोट, कपुरथला, संग्रूर, अमृतसर, पटीयाला, श्री मुक्तसर साहीब, मलेरकोटला, भटिंडा, फझिलका आणि गुरुदासपूर येथील भागात ब्लॅकआऊट घोषित करण्यात आला आहे. तर लुधियानामध्ये प्रशासनाने स्वतःहून ब्लॅकआऊट करण्याचे आदेश दिले आहेत. जालंधर येथे खबरदारीचा उपाय म्हणून दिवे घालविण्यात आले आहेत.
शस्त्रविराम करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर पुढच्या काही तासांतच पाकिस्तानची पुन्हा आगळीक समोर आली आहे. शस्त्रविरामानंतर काही तासांतच श्रीनगरमध्ये श्रीनगरमध्ये ड्रोन दिसल्याचा ओमर अब्दुल्ला यांनी दावा केला आहे. .या संदर्भातील त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने…”
Video: पाकिस्ताननं केलेले कोणते दावे भारतीय लष्करानं खोडून काढले? थेट पत्रकार परिषदेत मांडलं सत्य!
Video: “इथून पुढे जर पाकिस्तानने…”, शस्त्रविरामानंतर भारतानं दिला इशारा; संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषदेत माहिती
संरक्षण दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, भारतीय सैन्यदल भारताची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तान लष्कराचे मोठे नुकसान केले आहे. पाकिस्तानचे एअर डिफेन्स, रडार सिस्टिमलाही निकामी केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानच्या लॉजिस्टिक यंत्रणेला आणि पाकिस्तानच्या लष्करी प्रणालीचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. यापुढे पाकिस्तान स्वतःची सुरक्षा किंवा हल्ला करू शकणार नाही, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
भारतीय सैन्याने मशिदीचे नुकसान केले, असा अपप्रचार पाकिस्तानकडून होत आहे. मात्र हा भ्रामक प्रचार खोटा असल्याचे आम्ही जाहीर करतो. भारत हा एक सेक्यूलर देश आहे. भारतीय सैन्यदल संविधानाचा आदर करतो आणि त्याप्रमाणे वागतो”, असे सांगून कर्नल सोफिया कुरेशी यांनी धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळला.
Watch | Special Briefing by Ministry of Defence on Operation Sindoor | May 10, 2025 | ??
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 10, 2025
https://t.co/JSeqtlaw5c
परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर संरक्षण मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन शस्त्रविरामाची माहिती देण्यात येत आहे.
Watch | Special Briefing by Ministry of Defence on Operation Sindoor | May 10, 2025 | ??
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 10, 2025
https://t.co/JSeqtlaw5c
“भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आजवर कोणतीही तडजोड न करता ठाम अशी भूमिका घेतलेली आहे आणि पुढेही घेत राहिल”, अशी पोस्ट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे.
India and Pakistan have today worked out an understanding on stoppage of firing and military action.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 10, 2025
India has consistently maintained a firm and uncompromising stance against terrorism in all its forms and manifestations. It will continue to do so.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट टाकून भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचा दावा केला. भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामासाठी तयार झाल्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांच्या पोस्टनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेतही हीच घोषणा केली.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025
भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ हे पुन्हा १२ मे रोजी चर्चा करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, जमीन, आकाश आणि समुद्राद्वारे होणाऱ्या सर्व कारवाया थांबविण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शस्त्रसंधीची मागणी केली. भारताने आपल्या अटींवर शस्त्रसंधीस परवानगी दिली आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे.
DGMOs of India and Pak agreed that both sides would stop all firing and military action on land, air and sea from 5 pm: Misri
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2025
India Pakistan News LIVE Updates: परराष्ट्र मंत्रालयाची ६ वाजता पत्रकार परिषद; कोणती घोषणा करणार?
परराष्ट्र मंत्रालयाकडून थोड्याच वेळात ६ वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यात सकाळपासून बदललेल्या घडामोडींची माहिती दिली जाईल.
India-Pakistan Tension : देशसेवेसाठी तरुणांचा उत्साह शिगेला! ‘सिव्हील डिफेन्स वॉलंटियर’ बनण्यासाठी हजारो तरुणांची उपस्थिती
Colonel Sofiya Qureshi Sister: सोफिया कुरेशींची जुळी बहीण आहे वंडर वुमन; जाणून डॉ. शायना सुनसारा काय करतात?
India Pakistan News LIVE Updates: तणाव कमी करण्यासाठी सौदी अरेबियाचा पुढाकार; भारत-पाकिस्तानशी फोनवरून चर्चा
भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळावा यासाठी सौदी अरेबियाने प्रयत्न सुरू केले आहेत. सौदीचे परराष्ट्र मत्री फैसल बिन फरहान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही देशांनी लष्करी कारवाया थांबवाव्यात असे फैसल बिन फरहान यांनी सांगितले.
Mehbooba Mufti : “दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याकरता भारताने पुढाकार घ्यावा”, मेहबुबा मुफ्तींचं आवाहन; म्हणाल्या, “आपली ताकद…”
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामाची घोषणा झाली आहे.