Pune-Maharashtra Breaking News Today, 20 Oct 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. तर, मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बहुचर्चित त्रैवार्षिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आल्याने आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या भाषणामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
याशिवाय महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने कारवाई करत पीएफआयच्या पनवेल सचिवासह बंदी घातलेल्या संघटनेच्या अन्य दोन जणांना अटक केली आहे.
यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सर्व घडामोडी वाचा सविस्तर फक्त एकाच क्लिकरवर.
Maharashtra Latest News Updates : यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सर्व घडामोडी वाचा सविस्तर फक्त एकाच क्लिकरवर.
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींची तुलना रावणाशी करतानाच त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या मार्गावरून काँग्रेसला धारेवर धरलं आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परस्थितीवर परखड मत व्यक्त केलं आहे. खोके देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर विकत घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही राजकीय संस्कृती नसते, असंही ते म्हणाले आहेत. वाचा सविस्तर बातमी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी या प्रकरणामध्ये तत्काळ चौकशीचे आदेश दिल्याची माहिती राम शिंदेंनी दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे. ‘पीएफआय’सह तिच्याशी संबंधित आठ संघटनांवरही बंदी घालण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. असे असतानाही पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालाचाली सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परस्थितीवर परखड मत व्यक्त केलं आहे. खोके देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर विकत घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही राजकीय संस्कृती नसते, असंही ते म्हणाले आहेत.