Maharashtra Political Crisis Updates : करोनामुळे जवळपास दोन वर्ष आपल्या उत्साहाला मुरड घालावी लागलेल्या दहीहंडी पथकांसाठी आज उत्साहाचा दिवस आहे. कारण कोणत्याही निर्बंधांविना मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतरही भागांमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे. राज्यात सत्तेची हंडी फोडणाऱ्या सरकारनं दहीहंडी पथकांसाठी जाहीर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमुळे ही हंडी पथकांसाठी अजूनच आनंदाची ठरणार आहे. एकीकडे दहीहंडीचा उत्साह असताना दुसरीकडे पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांशी संबंधित व्यावसायिकांच्या दिशेनं ईडीनं आपला मोर्चा वळवला आहे.
Mumbai-Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
राज्यातील पहिल्या यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्राचा (रोबोटिक सर्जरी केंद्र) प्रस्ताव वाढीव निधीअभावी हाफकिनकडे रखडला होता. तीन महिन्यांपूर्वी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खनिकर्म महामंडळाकडून ३.८९ कोटींचा अतिरिक्त निधी मिळवून दिला. परंतु, निविदा प्रक्रिया झालेली असतानाही हाफकिनकडून यंत्रमानवाचा खरेदी आदेश निघत नसल्याने प्रकल्प रखडलेलाच आहे. वाचा सविस्तर बातमी…
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यंदापासून सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी फ्रान्स येथील ‘एकोसर्ट (ई ॲन्ड एच )’ सोबत सामंजस्य करार केला आहे. या प्रकारचा देशातील पहिलाच अभ्यासक्रम असल्याची माहिती कृषी विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यापीठातील तज्ज्ञांसह ‘एकोसर्ट (ई ॲन्ड एच )’चे विषय तज्ज्ञ सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या विषयाच्या अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत. वाचा सविस्तर बातमी…
मुंबईतील दादर परिसरात मुलींनी चार थरांची हंडी लावून गोकुळाष्टमी साजरी केली. यावेळी त्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
#WATCH | Maharashtra: Girls participate in the Dahi Handi competition in Mumbai on the occasion of Janmashtami
— ANI (@ANI) August 19, 2022
Visuals from Dadar Nakshatra Lane, Mumbai pic.twitter.com/0PwbhPd1y2
नागपूर आणि बिबट्याचा वावर हे समीकरण आता नागपुरकरांना तसं नवीन नाही, पण तरीही शहरात बिबट्या दिसला तर ते दहशतीत येतात. शहरातील दाभा परिसरात बिबट्याने कायम दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दाभा येथील तुलसी पार्क सेंट्रल शाळेजवळील कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झाल्याने वनखात्याने या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्री येथे कॅमेरा ट्रॅप लावण्यात येत आहे. वाचा सविस्तर बातमी…
भाजपाचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. लवकरच त्यांची नावे देशपातळीवर कळवणार आहोत, असे निंबाळकर म्हणाले आहोत. वाचा सविस्तर
सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीदेखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केले असून आरोपींविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, शिक्षकाने मारहाण केल्यानंतर या विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मोठे कष्ट घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी २५ दिवसांत ८ रुग्णालयं गाठली तसेच आपल्या मुलाचा जीव वाचावा म्हणून त्यांनी या काळात तब्बल १३०० किमी प्रवास केला आहे. वाचा सविस्तर
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जावर कौतुक होत असल्यानेच कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याआधी टाकलेल्या छाप्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं, आणि यावेळीही होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना ट्वीटरवरून धमकी देण्यात आली आहे. याबाबत वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…
पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण होऊनही रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले असतानाच शहरातील ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात ११ हजार ७०६ खड्ड्यांपैकी ११ हजार ४१८ खड्डे बुजविण्यात आले असून शहरात केवळ २८८ खड्डे असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…
“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदलले. पण, कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपेक्षित नियम करण्यासाठी अजून कोणत्याही सरकारला वेळ झाला नाही, ही अत्यंत खेदाची बाब असून नवीन सरकार तरी हे नियम करणार का?” असा सवाल महाराष्ट्र अंनिसमार्फत मुक्ता दाभोलकर आणि डॅा. हमीद दाभोलकर यांनी केला आहे. वाचा सविस्तर बातमी…
ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आज आक्रमक होत आंदोलन सुरू केले असून, एसी लोकल रोखल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवासी संतप्त झाले असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर बातमी…
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज लावले जात आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे, इन्स्टाग्रामवर धनश्रीने नावात केलेला बदल आणि युजवेंद्रने डिलीट केलेली स्टोरी ठरत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामला आणखी एक स्टोरी शेअर केली असून चर्चांवर भाष्य केलं आहे.
Bilkis Bano case: सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींची सुटका केल्यानंतर देशभरातून अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. बिल्किस बानो यांनीदेखील “आपल्यावर अत्याचार व आपल्या सात कुटुंबीयांची हत्या करणाऱ्या ११ दोषींच्या जन्मठेपेची शिक्षा शिथिल करत त्यांना मुक्त केल्याने मी सुन्न झाले आहे. न्यायव्यवस्थेवरील माझ्या श्रद्धेस धक्का पोहोचला असून, ती डळमळली आहे,’’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यादरम्यान, मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार आणि नोकरशहा यांच्यासह अनेक प्रसिद्ध मंडळींना निवेदन प्रसिद्ध करत दोषींची सुटका रद्द करण्याची मागणी केली. तब्बल सहा हजार जणांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
पत्रा चाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या यो दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय करत होतं. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या बक्षीस रकमा, कलावंतांची मांदियाळी यामुळे दहीहंडी उत्सवाला ग्लॅमर निर्माण केले होते. यातील साहस व क्रीडा कौशल्य लक्षात घेऊन त्याला आता साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली.
मुंबई, ठाणे, पुण्यात मानाच्या दहीहंडीसाठी थर लावायला सुरुवात, राजकीय नेतेमंडळींचाही मोठा वावर!
पत्रा चाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या यो दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय करत होतं. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह टुडे
Mumbai-Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!