Mumbai Maharashtra : वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास एकीकडे चालू असताना त्यावरून राज्यात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. हगवणे कुटुंबीयांचे राजकीय संबंध आणि त्यांना संरक्षण मिळत असल्याच्या आरोपांची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच महिला आयोगाच्या कारभारावरदेखील विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
Latest Maharashtra News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा…
पाकिस्तानाची सीमा ओलांडण्यासाठी नागपूरच्या महिलेने केला गुगल मॅप्सचा वापर
नागपुरातील मिडलँड कंपनीकडून शासनाची फसवणूक; बनावट ‘लेटरपॅड’, स्वाक्षरीद्वारे ‘रॉयल्टी क्लिअरन्स’
Sanjay Raut on Girish Mahajan: नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही – संजय राऊत
गिरीश महाजनांच्या १० पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवणं जमणार नाही. पाच-पंचवीस माणसं फोडणं म्हणजे काय पक्ष संपवणं असतं का? नरेंद्र मोदीही म्हणत होते ना काँग्रेस मुक्त भारत? त्यांच्याच कार्यकाळात काँग्रेस जास्त वाढली. त्याच काँग्रेसच्या खासदारांना विदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडावी लागली. गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे. नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही – संजय राऊत</p>
जड झाले ओझे…, रेल्वे स्थानकावरील ‘कुलीं’च्या सेवा दरात वाढ
शिवसेना प्रवेशानंतरही सिद्धराम म्हेत्रे यांच्यासमोरील अडचणी कायम राहणार ?
Sanjay Raut on Girish Mahajan: संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल
हातात पोलीस आहेत. टेंडरबाजी, खंडणीतून प्रचंड पैसे हाती आहेत. त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन ते पक्ष फोडत आहेत. त्यासाठी जे दलाल भाजपानं नेमले आहेत, त्यातले एक म्हणजे गिरीश महाजन. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. फोडू द्या पक्ष, ज्या दिवशी आमच्या हाती सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या काही भानगडींच्या चौकशा सुरू होत्या तेव्हा हे पक्ष बदलायला तयार होते. तेव्हा हेच निरोप पाठवत होते की मी राजकारणातून बाहेर पडतो, शांत बसतो. हे डरपोक लोक आहेत – संजय राऊत, शिवसेना उद्धव ठाकरे गट खासदार
Raj Thackeray Mumbai CP Meeting: राज ठाकरे देवेन भारतींच्या भेटीला…
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. या दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यासंदर्भात अद्याप पक्षाकडून किंवा खुद्द राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Maharashtra Women Commission: रोहिणी खडसेंची नीलम गोऱ्हेंनी बोलवलेल्या बैठकीवर आगपाखड
बैठकांमध्ये काय चर्चा करणार आहात? या बैठका आधी झाल्या असत्या तर कदाचित वैष्णवी जिवंत असती. वैष्णवीसारख्या असंख्य महिला आज जिवंत असत्या. आज महिला आयोगाकडे हुंडाबळीची प्रकरणं शून्य दाखवतं. त्यांच्याकडे अशा तक्रारी शून्य असल्याचं त्या गर्वाने सांगतात. हा मूर्खपणा चालू आहे महाराष्ट्रात. माझी सरकारला विनंती आहे की हा दिखावा बंद करावा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची वेळ आली आहे. महिला आयोगाला पूर्णवेळ न्याय देऊ शकेल, अशा व्यक्तीची तिथे नियुक्ती होणं गरजेचं आहे – रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या
मला निमंत्रण आलेलं आहे, पण मी बैठकीला जाणार नाहीये. हे उशीरा आलेलं शहाणपण आहे. हे सर्वात आधी करायला हवं होतं. विरोधकांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते म्हणून हे सगळं केलं जात आहे. या बैठकीतून काहीही निष्पन्न झालेलं नाही. आज वेळ आली आहे रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याची. कारण त्या निष्क्रिय अध्यक्षा आहेत. त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी बैठका कसल्या घेत आहात? – रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या
शरद पवार आणि अजित पवार, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Latest Maharashtra News Live Today: मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी