लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्माचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार असून त्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

अमरावती शहरात जन्मलेल्या जितेशने २०१३-१४ साली विजय हजारे चषकात विदर्भाच्यावतीने ‘अ’ दर्जाच्या सामन्यात पदार्पण केले. २०१५-१६ साली रणजी ट्रॉफीमध्ये जितेशचे पदार्पण झाले. २०१६ मधील आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सकडून जितेश खेळला होता.त्यानंतर जितेशने पंजाब किंग्स संघातर्फे आयपीएलमध्ये फलंदाजीत चमक दाखवली.

आणखी वाचा-ताडोबा प्रशासनाचे आवाहन; म्हणाले, ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या अफवेला आळा घाला

जितेशने आजवर शंभर टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये दोन हजारांच्यावर धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेतही भारतीय संघात समाविष्ट जितेश उत्तम खेळाचे प्रदर्शन करणार अशी अपेक्षा क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Batsman and wicket keeper jitesh sharma selected in indian cricket team for the five t20is against australia tpd 96 mrj