लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्याहातून शिवसेना पक्ष गेला, असे आम्हाला अजिबात वाटत नाही. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, तेव्हाची करणे वेगळी होती आणि ती पुन्हा ऐरणीवर आणायची वेळ आणू नका, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.

स्त्रीशक्ती संवाद यात्रेच्यानिमित्ताने किशोरी पेडणेकर रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्या नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ज्यांच्यामुळे दिग्गज नेते सेनेतून बाहेर पडले, त्यांच्या हातून आता पक्ष गेला, अशी टीका केली होती. त्याला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातून जाऊ शकत नाही. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाची कारणे वेगळी होती. ती समोर आणायची आमच्यावर वेळ आणू नका.”

आणखी वाचा-अयोध्येतील श्रीरामासाठी वैदर्भिय कन्येने केले ‘ड्रेस डिजायनिंग’

सध्या ज्या सरकारी यंत्रणा काम करत आहे. या यंत्रणाना स्वायत्त आहे का? आमच्या नेत्यांवर ईडीची कारवाई करत दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही दबावात येणार नाही. जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत, त्यांचा मागे राजकीय सुडबुद्धीने यंत्रणेला लावले जात आहे. असा आरोप त्यांनी केला

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not force us to tell why raj thackeray leave shiv sena kishori pednekars warning vmb 67 mrj