-
सकाळचा नाश्ता करायचा किंवा नाही (नाश्ता टाळणे) याबद्दलचे वाद अनेक वर्षांपासून सुरूच आहे. डिजिटल क्रिएटर व आहारतज्ज्ञ अंकिता श्रीवास्तव यांनी आमच्या लक्षात आणून दिले की, या तीन मुद्द्यांमुळे नाश्ता न करणेसुद्धा स्वीकारले जाऊ शकते.नाश्ता करताना तुमची निवड, तुमची भूक, हार्मोनल संतुलन व तुमची आरोग्य उद्दिष्टे (मग तुम्हाला स्नायू तयार करायचे आहेत किंवा वजन कमी करायचे आहे) यावर अवलंबून असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ‘दी इंडियन एक्स्प्रेसने’, चेन्नई येथील श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टच्या लेक्चरर सी. व्ही. ऐश्वर्या यांच्याशी चर्चा केली.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
भूक – तज्ज्ञांनी सांगितले की, शरीराच्या ऊर्जेच्या गरजा आणि एकूणच चयापचय क्रिया निश्चित करण्यात भूक महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषतः नाश्ता वगळण्याच्या परिणामाचा विचार करताना. आपली भूक घ्रेलिन (ghrelin) व लेप्टिन (leptin ) यांसारख्या संप्रेरकांद्वारे नियंत्रित केली जाते आणि नाश्ता न केल्याने हे संतुलन बिघडते, ज्यामुळे दिवसभरात भूक लागते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मग जास्त खाणे किंवा अस्वास्थ्यकर अन्न निवडणे या गोष्टी आपल्याकडून नकळत होतात. रात्रभर आपण काहीच खात नाही. त्यामुळे उपवास सोडण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे, ज्यामुळे चयापचय सुरू होतो. पण, सकाळच्या भुकेकडे दुर्लक्ष केल्याने चयापचय प्रतिसादास विलंब होऊ शकतो, परिणामी कमी ऊर्जा खर्च होते आणि कालांतराने वजन वाढू शकते, असे सी. व्ही. ऐश्वर्या म्हणाल्या आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
हार्मोन्स – या गोष्टींचा चयापचय प्रक्रियांवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. त्यामुळे नाश्ता वगळण्यापूर्वी हार्मोनल आरोग्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कॉर्टिसॉल, तणाव संप्रेरक, ऊर्जा एकत्रित करण्यात सकाळचा नाश्ता नैसर्गिकरीत्या मदत करू शकतो. त्यामुळे नाश्ता न केल्यास कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे पोटातील चरबीचा वाढणे,कालांतराने इन्सुलिनचा प्रतिकार होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
याव्यतिरिक्त रात्रभर उपाशी राहण्याच्या कालावधीनंतर इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यात नाश्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे जर तुम्ही नाश्ता केला नाहीत, तर ग्लुकोजचे नियमन विस्कळित होते; ज्यामुळे नंतरच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते. कालांतराने यामुळे टाईप-२ मधुमेह आणि इतर चयापचय विकार होण्याचा धोका वाढू शकतो.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
आरोग्य उद्दिष्टे – नाश्ता करणे टाळण्यापूर्वी आरोग्याच्या उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक आहे. कारण- ऊर्जा संतुलन, चयापचय आणि एकूणच शारीरिक कार्ये प्रभावित करण्यात नाश्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. नाश्त्याचा दिवसभरात कमी झालेल्या कॅलरीजशी संबंध असतो. त्यामुळे नाश्ता न केल्यामुळे अनेकदा भूक वाढते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
परिणामी ओव्हरॲक्टिंग (overacting) आणि पौष्टिक खराब स्नॅक्सनंतर (calorie-dense) जास्त काम करणे आणि वजन कमी करणे किंवा देखभाल करण्याच्या उद्दिष्टांमध्ये अडथळा येऊ शकतो. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळचा नाश्ता ग्लायकोजेन (glycogen) स्टोअर्स पुन्हा भरून काढतो. शारीरिक आणि संज्ञानात्मक ॲक्टिव्हिटी आवश्यक इंधन पुरवते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे सकाळचा नाश्ता न केल्यामुळे उर्जेच्या उपलब्धतेमुळे शारीरिक धमक आणि मानसिक सतर्कता कमी होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
Breakfast : सकाळी नाश्ता न करण्याचे तोटे तुम्हाला माहिती आहेत का? मग तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ मुद्दे समजून घ्या
Breakfast Health Benefits: नाश्ता करणे किंवा नाही तुमच्या निवड, भूक, हार्मोनल संतुलन आणि तुमची आरोग्य उद्दिष्टे यांच्यावर अवलंबून असते…
Web Title: Skipping breakfast can be acceptable but health expert lists 3 things to consider before you skip breakfast asp