ठाणे: मुंब्रा – दिवा स्थानका दरम्यान असलेल्या ज्या वळणावर अपघात झाला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी मनसेच्या एका कार्यकर्त्याने रेल्वे प्रशासनाला केली होती, आज त्याच मुलाला या अपघातात पाय गमवावे लागले असल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. ही अतिशय दुर्देवी घटना असून वाहतूक व्यवस्था उत्तम होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान झालेल्या लोकल अपघातात एकूण १३ प्रवासी पडले. ज्या वळणावर हा अपघात घडला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेचा कार्यकर्ता त्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहाराद्वारे केली होती. त्याचा तो पाठपुरावा देखील करत होता. परंतू, त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली नाही. आज, या अपघातात त्याला पाय गमवावे लागले आहेत. हे वळण नेमक कसे आहे, त्यावर उपाय काय करात येईल याचा रेल्वे प्रशासनाने विचार केला पाहिजे होता. त्यामुळे या अपघात सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याची संतापजनक प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी व्यक्त केली.

रेल्वे प्रशासनने पत्रकार परिषदेत म्हटलं, आम्ही रेल्वे गाड्यांना ऑटोमॅटिक दरवाजे लावणार, नेमके हे दरवाजे कसे लावणार. याबाबत आम्हाला समजून सांगा की फक्त आजचा दिवस ढकलण्यासाठी तुम्ही घोषणा केली आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. वाहतूक व्यवस्था उत्तम होणे गरजेचे आहे. परंतू ते होत नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आज जो अपघात झाला त्यात २५ ते २६ वयोगटातील मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. या परिस्थितीवर आताच नियंत्रण आणले पाहिजे नाही तर भविष्यात अशा घटना सतत होत राहणार असे मृत्यूचे तांडव तुम्हाला रोज पाहायला मिळणार, असे ही अविनाश जाधव म्हणाले.